शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या वेळेवर बसेसचा अभाव!

By admin | Updated: July 10, 2017 00:45 IST

भाजपा विद्यार्थी आघाडीच्यावतीने आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : २७ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातून व इतर ठिकाणावरून मुली शिक्षण घेण्यासाठी दररोज मेहकर येथे येत असतात. मात्र, शाळेच्या वेळेवर एसटी बसेस येत नसल्याने मुलींना शाळेत येण्यास उशीर होतो. त्यामुळे याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. मुलीच्या शाळेच्या वेळेवर एसटी बसेस सोडा; अन्यथा भाजपा विद्यार्थी आघाडीच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप इलग यांनी दिला.मेहकर येथे विविध लहान-मोठ्या शिक्षण संस्था, कॉलेज, शाळा आहेत. खेड्यापाड्यातून तसेच इतर ठिकाणाहून मुली दररोज मेहकर येथे येत असतात. मुलींसाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत स्वतंत्र एसटी बसेसची व्यवस्था केलेली आहे. या बसेस केवळ मुलींना ने-आण करण्यासाठी सोडण्यात येतात; परंतु सदर बसेस शाळेच्या वेळेवर संबंधित गावात पोहचत नसल्याने मुली शाळेत वेळेवर पोहचू शकत नाहीत. त्यामुळे बसफेऱ्यांचे नियोजन कोलमडल्याने शाळेत जाण्यासाठी मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसफेऱ्या वेळेवर सोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे कोणत्याच प्रकारचे नियोजन नसल्याने एसटी वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. मनमानी पद्धतीने व आगाराच्या सोयीनुसार या बसफेऱ्या सोडण्यात येतात. सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेवर मुलींना घरी जाण्यास वेळेवर बसेसची सुविधा होत नसल्याने बसस्थानकावर मुलींची गर्दी असते. मुलींना ताटकळत बसून बसेसची वाट पाहावी लागते. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर मुलींना घरी जाण्यासाठी सुद्धा उशीर होतो. मानव विकासच्या बसेस शाळेच्या वेळेवर सोडा; अन्यथा भाजपा विद्यार्थी आघाडीच्यावतीने कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप इलग, राजू निकम, शंकर गायकवाड, सदाम शाह, प्रा. केशवराव वाहेकर आदींनी दिला आहे. मुलींना खासगी वाहनाने करावा लागतो प्रवास!ग्रामीण भागातून मुलींना दररोज मेहकर येथे शिक्षण घेण्यासाठी यावे लागते; परंतु मानव विकासाच्या बसेस वेळेवर येत नसल्याने मुलींना शाळेत जाण्यास उशीर होतो. त्यामुळे मुलींना नाईलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यासाठी मुलींच्या पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. खासगी वाहनधारक व आगाराचे अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे की काय? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.