शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

कृषी सेवा केंद्र ७ ते ७ या वेळात सुरू ठेवण्याची मुभा मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:35 IST

चिखली : लॉकडाऊनमध्ये कृषी सेवा केंद्रधारकांना कुठल्याही प्रकारची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे मिळण्यास ...

चिखली : लॉकडाऊनमध्ये कृषी सेवा केंद्रधारकांना कुठल्याही प्रकारची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे मिळण्यास अडचण उद्भवली आहे. त्यामुळे जिल्हा कृषी साहित्य विक्रेता व उत्पादक असोसिएशनच्या वतीने जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड. सुनील हासनराव देशमुख यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या १५ मे ते १५ जून या खरीप हंगामाच्या काळात कृषी सेवा केंद्रांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळात उघडे ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे व स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र या लॉकडाऊनमध्ये कृषी सेवा केंद्रधारकांना कुठल्याही प्रकारची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना बियाणे-खते वेळेवर मिळत नाहीत. प्रामुख्याने खरीप हंगामात १५ मे ते १५ जून या कालावधीतच शेतकरी बी-बियाणे व खतांची तजवीज करीत असतात. मात्र, नेमक्या याच काळात लॉकडॉऊन असल्याने शेतकऱ्यांसह कृषिकेंद्र चालक अडचणीत आले आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा कृषी साहित्य विक्रेता व उत्पादक असोसिएशनच्यावतीने जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड. सुनील देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन खरीप हंगामाच्या काळात कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळात उघडे ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या काळात बुलडाणा जिल्ह्यात जवळपास १५०० मे. टन रासायनिक खते व बियाणांची उलाढाल होते. लॉकडाऊनमुळे कपाशी बियाणे, ज्वारी, मक्का, मूग, उडीद, तूर बियाणे १० टक्के उपलब्ध होऊ शकले नाही. सोयाबीन बियाणेसुद्धा २५ टक्केपर्यंत उपलब्ध आहे. २५ मे पासून कपाशी बियाणे परवानगी येणार असल्याकारणाने कृषी सेवा केंद्रधारकांच्या अडचणीबाबत प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा व कृषी सेवा केंद्रांना या लॉकडाऊनमधून मुभा मिळावी, अशी मागणी अ‍ॅड. देशमुख यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.