शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

कृषी सेवा केंद्र ७ ते ७ या वेळात सुरू ठेवण्याची मुभा मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:35 IST

चिखली : लॉकडाऊनमध्ये कृषी सेवा केंद्रधारकांना कुठल्याही प्रकारची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे मिळण्यास ...

चिखली : लॉकडाऊनमध्ये कृषी सेवा केंद्रधारकांना कुठल्याही प्रकारची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे मिळण्यास अडचण उद्भवली आहे. त्यामुळे जिल्हा कृषी साहित्य विक्रेता व उत्पादक असोसिएशनच्या वतीने जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड. सुनील हासनराव देशमुख यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या १५ मे ते १५ जून या खरीप हंगामाच्या काळात कृषी सेवा केंद्रांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळात उघडे ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे व स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र या लॉकडाऊनमध्ये कृषी सेवा केंद्रधारकांना कुठल्याही प्रकारची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना बियाणे-खते वेळेवर मिळत नाहीत. प्रामुख्याने खरीप हंगामात १५ मे ते १५ जून या कालावधीतच शेतकरी बी-बियाणे व खतांची तजवीज करीत असतात. मात्र, नेमक्या याच काळात लॉकडॉऊन असल्याने शेतकऱ्यांसह कृषिकेंद्र चालक अडचणीत आले आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा कृषी साहित्य विक्रेता व उत्पादक असोसिएशनच्यावतीने जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड. सुनील देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन खरीप हंगामाच्या काळात कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळात उघडे ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या काळात बुलडाणा जिल्ह्यात जवळपास १५०० मे. टन रासायनिक खते व बियाणांची उलाढाल होते. लॉकडाऊनमुळे कपाशी बियाणे, ज्वारी, मक्का, मूग, उडीद, तूर बियाणे १० टक्के उपलब्ध होऊ शकले नाही. सोयाबीन बियाणेसुद्धा २५ टक्केपर्यंत उपलब्ध आहे. २५ मे पासून कपाशी बियाणे परवानगी येणार असल्याकारणाने कृषी सेवा केंद्रधारकांच्या अडचणीबाबत प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा व कृषी सेवा केंद्रांना या लॉकडाऊनमधून मुभा मिळावी, अशी मागणी अ‍ॅड. देशमुख यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.