शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

कोतवाल भरतीमध्ये वारसांना डावलले

By admin | Updated: May 25, 2015 03:02 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार; शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा कोतवालांच्या वारसांचा आरोप.

मेहकर : कोतवालांच्या रिक्त जागा भरताना सेवानवृत्त व मरण पावलेल्या कोतवालांच्या वारसांना प्रथम प्राधान्य देण्याचे पूर्वीचे शासनाचे आदेश आहेत; मात्र बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या भरतीमध्ये आपआपल्या मर्जीतीलच उमेदवारांना पाधान्य देऊन कोतवालांच्या वारसांचा न्याय्य हक्क डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे. इंग्रजांच्या काळापासून जागत्या, वेसकर, चौकीदार, गावकामदार व आता कोतवाल या नावाने शासनाच्या सर्व विभागांसह महसूल विभागामध्ये केवळ आठ रुपये या अल्पशा मानधनावर वयाच्या ६0 वर्षांपर्यंत शासनाची २४ तास अखंड सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. कोतवालांची एकमेव चतुर्थश्रेणीची मुख्य मागणीसुद्धा शासनाने मंजूर केली नाही. कोतवालांच्या रिक्त जागा भरताना सेवानवृत्त व मरण पावलेल्या कोतवालांच्या जागी त्यांच्या वारसांना प्रथम प्राधान्य देण्याचे तसेच परीक्षेमध्ये ५0 टक्के अतिरिक्त गुण देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार कोतवाल संघटनेच्या माध्यमातून रिक्त जागा वारसांमधूनच भरण्यात याव्यात, या मागणीसाठी सतत निवेदने देण्यात आली; परंतु शासनाने कोतवाल संघटनेच्या या मागणीची दखल न घेता वारसांना कुठलेच प्राधान्य तथा अतिरिक्त गुण न देता रिक्त जागा भरताना सर्व ठिकाणी एकच पद्धत ठेवावी, असा आदेश ५ सप्टेंबर २0१३ रोजी काढला होता. त्यानुसार सर्वच ठिकाणी समानता व सुसूत्रीकरणानुसारच रिक्त जागा भरण्यात याव्यात, असे स्पष्ट आदेश असतानासुद्धा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या कोतवाल भरतीमध्ये आपआपल्या मर्जीतीलच उमेदवारांना कोतवाल पदावर नियुक्ती देऊन वारसांवर अन्याय केला आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या कोतवाल भरतीमध्ये घेण्यात आलेल्या १८५ रिक्त जागांसाठीसुद्धा शासनाच्या समानता व सुसूत्रीकरणाच्या नियमांचे पालन न करता जिल्ह्यातील तहसीलदारांनी वेगवेगळे पेपर काढून, वेगवेगळे जाहीरनामे काढून आपआपल्या मर्जीतीलच उमेदवारांना घेऊन कोतवालांच्या वारसांना भरतीमध्ये डावलण्यात आल्याचा आरोप केला आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ! शासन कोतवालांना अवर्गीकृत समजून महाराष्ट्र नागरी सेवेचे नियमसुद्धा लागू करीत नसल्यामुळे नवृत्तीनंतर त्यांना पेन्शन अथवा नवृत्ती वेतन मिळत नाही. त्यामुळे राज्यामध्ये इंग्रजांच्या काळापासून तर आजपर्यंत नवृत्त झालेल्या कोतवाल व मरण पावलेल्या कोतवालांच्या पत्नीसह कुटंबीयांना उपासमारीचे जीवन जगावे लागत आहे. शासनाचे दुर्लक्ष असल्याने कोतवालांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोतवालांच्या वारसांना तरी या भरतीमध्ये समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे.