शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाल भरतीमध्ये वारसांना डावलले

By admin | Updated: May 25, 2015 03:02 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार; शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा कोतवालांच्या वारसांचा आरोप.

मेहकर : कोतवालांच्या रिक्त जागा भरताना सेवानवृत्त व मरण पावलेल्या कोतवालांच्या वारसांना प्रथम प्राधान्य देण्याचे पूर्वीचे शासनाचे आदेश आहेत; मात्र बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या भरतीमध्ये आपआपल्या मर्जीतीलच उमेदवारांना पाधान्य देऊन कोतवालांच्या वारसांचा न्याय्य हक्क डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे. इंग्रजांच्या काळापासून जागत्या, वेसकर, चौकीदार, गावकामदार व आता कोतवाल या नावाने शासनाच्या सर्व विभागांसह महसूल विभागामध्ये केवळ आठ रुपये या अल्पशा मानधनावर वयाच्या ६0 वर्षांपर्यंत शासनाची २४ तास अखंड सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. कोतवालांची एकमेव चतुर्थश्रेणीची मुख्य मागणीसुद्धा शासनाने मंजूर केली नाही. कोतवालांच्या रिक्त जागा भरताना सेवानवृत्त व मरण पावलेल्या कोतवालांच्या जागी त्यांच्या वारसांना प्रथम प्राधान्य देण्याचे तसेच परीक्षेमध्ये ५0 टक्के अतिरिक्त गुण देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार कोतवाल संघटनेच्या माध्यमातून रिक्त जागा वारसांमधूनच भरण्यात याव्यात, या मागणीसाठी सतत निवेदने देण्यात आली; परंतु शासनाने कोतवाल संघटनेच्या या मागणीची दखल न घेता वारसांना कुठलेच प्राधान्य तथा अतिरिक्त गुण न देता रिक्त जागा भरताना सर्व ठिकाणी एकच पद्धत ठेवावी, असा आदेश ५ सप्टेंबर २0१३ रोजी काढला होता. त्यानुसार सर्वच ठिकाणी समानता व सुसूत्रीकरणानुसारच रिक्त जागा भरण्यात याव्यात, असे स्पष्ट आदेश असतानासुद्धा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या कोतवाल भरतीमध्ये आपआपल्या मर्जीतीलच उमेदवारांना कोतवाल पदावर नियुक्ती देऊन वारसांवर अन्याय केला आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या कोतवाल भरतीमध्ये घेण्यात आलेल्या १८५ रिक्त जागांसाठीसुद्धा शासनाच्या समानता व सुसूत्रीकरणाच्या नियमांचे पालन न करता जिल्ह्यातील तहसीलदारांनी वेगवेगळे पेपर काढून, वेगवेगळे जाहीरनामे काढून आपआपल्या मर्जीतीलच उमेदवारांना घेऊन कोतवालांच्या वारसांना भरतीमध्ये डावलण्यात आल्याचा आरोप केला आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ! शासन कोतवालांना अवर्गीकृत समजून महाराष्ट्र नागरी सेवेचे नियमसुद्धा लागू करीत नसल्यामुळे नवृत्तीनंतर त्यांना पेन्शन अथवा नवृत्ती वेतन मिळत नाही. त्यामुळे राज्यामध्ये इंग्रजांच्या काळापासून तर आजपर्यंत नवृत्त झालेल्या कोतवाल व मरण पावलेल्या कोतवालांच्या पत्नीसह कुटंबीयांना उपासमारीचे जीवन जगावे लागत आहे. शासनाचे दुर्लक्ष असल्याने कोतवालांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोतवालांच्या वारसांना तरी या भरतीमध्ये समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे.