शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महालक्ष्मी तलावात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:34 IST

साखरखेर्डा : येथील महालक्ष्मी तलावात राजरोसपणे मातीयुक्त धान्य धुतल्या जात असल्याने पाणी गढूळ होत आहे़ तसेच काही ...

साखरखेर्डा : येथील महालक्ष्मी तलावात राजरोसपणे मातीयुक्त धान्य धुतल्या जात असल्याने पाणी गढूळ होत आहे़ तसेच काही नागरिक मुक्तपणे तलाव परिसराचा शौचासाठी उपयोग करीत आहे. याची दखल ग्रामपंचायतीने घेऊन पाणी अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

साखरखेर्डा गावाची लोकसंख्या १८ हजार असून गावाला महालक्ष्मी तलावातून पाणीपुरवठा केला जातो़ मागील २०१५ ते १०१८ या तीन ते चार वर्षांत पाऊस कमी पडल्याने गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. या काळात ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले होते. दोन वर्षांपासून पाऊस समाधानकारक पडल्याने तलाव भरला होता. त्यामुळे पाणी टंचाईपासून नागरिकांची मुक्तता झाली होती . आजही महालक्ष्मी तलावात पाणीसाठा ५० टक्के असून एप्रिल, मे जून महिन्यात पुरेल एवढा पाणीसाठा आहे . ते पाणी गावातील दोन जलकुंभात भरुन नागरिकांना आठवड्यातून एक वेळा सोडल्या जाते. काही नागरिक या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात. गावात शुध्द पाणी पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य जरी असले तरी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शुद्ध पाणी पुरवठा करणे शक्य नाही. परंतू आहे ते पाणी गढुळ होऊ नये, त्या तलावात मातीयुक्त धान्य , कपडे धुतल्या जाऊ नये , तलाव परिसराचा शौचालयासाठी उपयोग होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने दक्षता बाळगावी, अशी मागणी केली आहे .

महालक्ष्मी तलावात मातीयुक्त धान्य धुतल्या जात असून तलाव परिसराचा शौचालयासाठी उपयोग केला जातो . त्यामुळे पाणी दूषित होत आहे .

* संतोष मंडळकर .

साखरखेर्डा

महालक्ष्मी तलावावर कर्मचारी नियुक्त करण्यात येईल़ पाणी स्वच्छ कसे राहील यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येतील़

प्रकाश आढाव, ग्राम विकास अधिकारी ,

साखरखेर्डा