शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

महालक्ष्मी तलावात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:34 IST

साखरखेर्डा : येथील महालक्ष्मी तलावात राजरोसपणे मातीयुक्त धान्य धुतल्या जात असल्याने पाणी गढूळ होत आहे़ तसेच काही ...

साखरखेर्डा : येथील महालक्ष्मी तलावात राजरोसपणे मातीयुक्त धान्य धुतल्या जात असल्याने पाणी गढूळ होत आहे़ तसेच काही नागरिक मुक्तपणे तलाव परिसराचा शौचासाठी उपयोग करीत आहे. याची दखल ग्रामपंचायतीने घेऊन पाणी अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

साखरखेर्डा गावाची लोकसंख्या १८ हजार असून गावाला महालक्ष्मी तलावातून पाणीपुरवठा केला जातो़ मागील २०१५ ते १०१८ या तीन ते चार वर्षांत पाऊस कमी पडल्याने गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. या काळात ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले होते. दोन वर्षांपासून पाऊस समाधानकारक पडल्याने तलाव भरला होता. त्यामुळे पाणी टंचाईपासून नागरिकांची मुक्तता झाली होती . आजही महालक्ष्मी तलावात पाणीसाठा ५० टक्के असून एप्रिल, मे जून महिन्यात पुरेल एवढा पाणीसाठा आहे . ते पाणी गावातील दोन जलकुंभात भरुन नागरिकांना आठवड्यातून एक वेळा सोडल्या जाते. काही नागरिक या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात. गावात शुध्द पाणी पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य जरी असले तरी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शुद्ध पाणी पुरवठा करणे शक्य नाही. परंतू आहे ते पाणी गढुळ होऊ नये, त्या तलावात मातीयुक्त धान्य , कपडे धुतल्या जाऊ नये , तलाव परिसराचा शौचालयासाठी उपयोग होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने दक्षता बाळगावी, अशी मागणी केली आहे .

महालक्ष्मी तलावात मातीयुक्त धान्य धुतल्या जात असून तलाव परिसराचा शौचालयासाठी उपयोग केला जातो . त्यामुळे पाणी दूषित होत आहे .

* संतोष मंडळकर .

साखरखेर्डा

महालक्ष्मी तलावावर कर्मचारी नियुक्त करण्यात येईल़ पाणी स्वच्छ कसे राहील यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येतील़

प्रकाश आढाव, ग्राम विकास अधिकारी ,

साखरखेर्डा