शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

५४ हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी

By admin | Updated: May 22, 2017 00:31 IST

खरीप पीक पेरणी नियोजन : गतवर्षीच्या तुलनेत १ हजार १५२ हेक्टरने वाढ

किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : तालुका कृषि कार्यालयाने तालुक्यातील खरीप पिक पेरणीचे नियोजन केले असून २०१७ च्या खरीप पिकासाठी एकूण ५४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदाच्या खरीप हंगाम पिकाच्या क्षेत्रात १ हजार १५२ हेक्टर ने वाढ झाली आहे. नियोजनानुसार ज्वारी ५०० हेक्टर, तूर १०००० हेक्टर, मुग २००० हेक्टर, उडीद १५०० हेक्टर, सोयाबीन ३८००० हेक्टर, कपाशी २००० हेक्टर, इतर ५०० असे एकूण ५४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्यामुळे खरीप हंगामात शेतकरी मोठ्या संख्येने पेरणी करणार आहे. पिक कर्ज मंजुरी झाल्यास लवकरच शेतात खरीप हंगामाच्या पेरणीचे काम चालू होणार आहे. यावर्षी सोयाबीन, तूर व इतर काही पेरणी क्षेत्र नियोजनामध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. खरीप हंगाम पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे बियाणे व खतांची कमतरता पडणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. बियाणे व खतांचे राज्य स्तरावरच प्रभावी नियोजन असल्यामुळे शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची कमतरता भासणार नाही, अशी माहिती तालुका कृषि अधिकारी गणेश गिरी यांनी दिली आहे. सन २०१६ मध्ये ५३ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. यंदाच्या खरीप हंगाम पिकाच्या क्षेत्रात १ हजार १५२ हेक्टरने वाढ करण्यात आली आहे. नियोजनानुसार ज्वारीचे २४८ हेक्टर वरून ५०० हेक्टर वर वाढ करण्यात आली आहे. तूरी चाही पेरा ९ हजार ५४६ हेक्टर वरून १०००० हेक्टर वाढला आहे. मुंग १ हजार ९४२ हेक्टर वरून २००० हेक्टर पेरण्यात येणार आहे. २०१६ मध्ये उडीदचे पेरणी क्षेत्र १ हजार ९१९ हेक्टर होते. मात्र यावर्षी उडीदचे ४१९ हेक्टर पेरणी क्षेत्र घटून १ हजार ५०० हेक्टर करण्यात आले आहे. सोयाबीनच्या पेरणीत वाढ होऊन ३७ हजार ७३६ हेक्टर वरून ३८००० हेक्टर झाले आहे. कपाशी १ हजार १४६ हेक्टर वरून २००० हेक्टर करण्यात आले आहे. इतर ५०० असे एकूण ५४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी पावसाने बऱ्यापैकी साथ दिल्याने तालुक्यात सोयाबीन, तुर, कपाशी व अन्य खरीपाच्या पिकाला चांगली झडती मिळाली. उत्पन्न चांगले वाढले. मात्र शेतकऱ्यांच्या या मालाला यावर्षी चांगला भाव न मिळाल्याने शेतकरी चांगलाच मेटाकूटीला आला. सध्या शेतकाऱ्यांना यावर्षीच्या पेरणीचे नियोजन करयाचे आहे. बँकांनी वेळेच्या आत कर्ज पुरवठा केला तर बळीराजा सुध्दा वेळेवर पेरणी करेल अन्यथा पुन्हा शेतकऱ्यांची फरफट आहेच. भुईमुगाच्या लागवडीत घटलोणार तालुक्यात सोयाबीन हेच प्रमुख पीक असून दरवर्षी तुरीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. याशिवाय तालुक्यात खरिपात बाजरी, ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूगाचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच कृषी विकास अधिकारी सह प्रत्येक चार तालुक्यांत एक या प्रमाणे एकूण सहा भरारी पथके आहेत.