शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

खरीप पेरणीचे नियोजन कोलमडले

By admin | Updated: May 16, 2017 19:51 IST

मृग नक्षत्र २२ दिवसांवर: खत,बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचणी

ऑनलाइन लोकमतबुलडाणा : मृग नक्षत्र २२ दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे व खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचे तसेच सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहे. यावर्षी मालाला भाव मिळाला नाही व तूरीची विक्री झाली नसल्याने शेतकऱ्यांना खत व बियाणे खरेदीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे खरीप पेरणीचे नियोजन कोलमडले आहे.यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्याने राज्यभर खरीप पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. खरीप पेरणीचे मृग नक्षत्र अगदी जवळ येत असल्याने शेतकरीही पेरणीच्या तयारीला लागला आहे. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडल्याने पेरणी करीता लागणारे खत व बि-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत. त्याला कारण गतवर्षी पिकांना मिळालेला अत्यल्प भाव आहे. सोयाबीन पिकाने प्रतिक्विंटल २ हजार ५०० रुपयांपर्यतचाही भाव ओलांडला नाही. तर तूरीच्या पैशातून बहुतांश शेतकरी खरीप पिकासाठी लागणाऱ्या खत बि-बियाण्याची खरेदी करून पेरणीचा खर्च भागवतात. मात्र, तूरीलाही ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शासानाने नाफेड केंद्र सुरू केले मात्र तेही अडचणीत असल्याने अनेक शेतकरी आपली तूर विकू शकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ खरीप पेरणीकरिता पैसेच नसल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. मृग नक्षत्रात पेरणी साधली की पीक नक्की चांगले येते याचा शेतकऱ्यांना चांगला अनुभव आहे. मात्र खत व बि-बियाणे खरेदी अभावी पेरणी लांबली, तर  उत्पादनावरही परिणाम होतो. पेरणी लांबल्यास मृग नक्षत्रात पेरा केल्यामुळे हमखास येणारी मूग व उडीद ही दोन पिके  शेतकऱ्यांना घेताच येत नाहीत. त्यामुळे वेळेवर म्हणजे मृग नक्षत्रतच पेरणी व्हावी, यासाठी शेतकरी धडपड करित आहेत.

पीक कर्जाची प्रतीक्षासध्या खरीप पेरणी पूर्व कामांना वेग आला आहे. मात्र, हातात पैसे नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. बँकेतील कर्ज भरल्यानंतर पेरणीसाठी नविन पीक कर्ज घेता येते; मात्र जवळ पैसेच नसल्याने बँकेतही शेतकऱ्यांची अडवणूक होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीककर्जाचे पुर्नगठण करून पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

खत, बियाणे खरेदीवर मंदीयावर्षी मान्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागासह अनेकांनी गेल्या महिन्याभरापासून जाहीर केल्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत पावसाने ५० टक्क्यांवर सरासरी ओलांडली नाही. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन व बाजारपेठेची उलाढाल यावर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. यावर्षी सुद्धा पिकाला भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत. त्यामुळे खत व बि-बियाण्यांसह पेरणीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीवर मंदी जाणवत आहे.