शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पेरणीचे नियोजन कोलमडले

By admin | Updated: May 16, 2017 19:51 IST

मृग नक्षत्र २२ दिवसांवर: खत,बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचणी

ऑनलाइन लोकमतबुलडाणा : मृग नक्षत्र २२ दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे व खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचे तसेच सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहे. यावर्षी मालाला भाव मिळाला नाही व तूरीची विक्री झाली नसल्याने शेतकऱ्यांना खत व बियाणे खरेदीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे खरीप पेरणीचे नियोजन कोलमडले आहे.यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्याने राज्यभर खरीप पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. खरीप पेरणीचे मृग नक्षत्र अगदी जवळ येत असल्याने शेतकरीही पेरणीच्या तयारीला लागला आहे. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडल्याने पेरणी करीता लागणारे खत व बि-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत. त्याला कारण गतवर्षी पिकांना मिळालेला अत्यल्प भाव आहे. सोयाबीन पिकाने प्रतिक्विंटल २ हजार ५०० रुपयांपर्यतचाही भाव ओलांडला नाही. तर तूरीच्या पैशातून बहुतांश शेतकरी खरीप पिकासाठी लागणाऱ्या खत बि-बियाण्याची खरेदी करून पेरणीचा खर्च भागवतात. मात्र, तूरीलाही ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शासानाने नाफेड केंद्र सुरू केले मात्र तेही अडचणीत असल्याने अनेक शेतकरी आपली तूर विकू शकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ खरीप पेरणीकरिता पैसेच नसल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. मृग नक्षत्रात पेरणी साधली की पीक नक्की चांगले येते याचा शेतकऱ्यांना चांगला अनुभव आहे. मात्र खत व बि-बियाणे खरेदी अभावी पेरणी लांबली, तर  उत्पादनावरही परिणाम होतो. पेरणी लांबल्यास मृग नक्षत्रात पेरा केल्यामुळे हमखास येणारी मूग व उडीद ही दोन पिके  शेतकऱ्यांना घेताच येत नाहीत. त्यामुळे वेळेवर म्हणजे मृग नक्षत्रतच पेरणी व्हावी, यासाठी शेतकरी धडपड करित आहेत.

पीक कर्जाची प्रतीक्षासध्या खरीप पेरणी पूर्व कामांना वेग आला आहे. मात्र, हातात पैसे नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. बँकेतील कर्ज भरल्यानंतर पेरणीसाठी नविन पीक कर्ज घेता येते; मात्र जवळ पैसेच नसल्याने बँकेतही शेतकऱ्यांची अडवणूक होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीककर्जाचे पुर्नगठण करून पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

खत, बियाणे खरेदीवर मंदीयावर्षी मान्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागासह अनेकांनी गेल्या महिन्याभरापासून जाहीर केल्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत पावसाने ५० टक्क्यांवर सरासरी ओलांडली नाही. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन व बाजारपेठेची उलाढाल यावर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. यावर्षी सुद्धा पिकाला भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत. त्यामुळे खत व बि-बियाण्यांसह पेरणीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीवर मंदी जाणवत आहे.