शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धेच्या पाहुणचाराने भारावले वारकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:00 IST

तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करून श्रींची पालखी पंढरपूर येथून परतीच्या वाटेने माहेरकडे निघाली आहे. या प्रवासात खामगाव हा श्रींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम शनिवारी असून, रजतनगरीतील भाविकांनी श्रींच्या पालखीसह सोबत असलेल्या शेकडो वारक-यांना श्रद्धेचा पाहुणचार केला.

ठळक मुद्देहजारो भाविकांनी केले ‘श्रीं’चे खामगावात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करून श्रींची पालखी पंढरपूर येथून परतीच्या वाटेने माहेरकडे निघाली आहे. या प्रवासात खामगाव हा श्रींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम शनिवारी असून, रजतनगरीतील भाविकांनी श्रींच्या पालखीसह सोबत असलेल्या शेकडो वारकºयांना श्रद्धेचा पाहुणचार केला. श्रींच्या पालखीचे शहरात विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, धार्मिक आणि युवक मंडळीच्या वतीने ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांची पायदळ वारी शेगाव येथून ११ जून रोजी पंढरपूरकडे रवाना झाली होती. आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करीत पालखी परतीच्या मार्गावर आहे. रजतनगरीत शनिवारी सकाळी अश्व, ध्वज व वारकरी बंधूंसह हरिनामाच्या जयघोषात व टाळ, मृदृंगाच्या गजरात श्रींच्या पालखीचे आगमन झाले. खामगाव बायपास रोडवरील हनुमान व्हिटामीन येथे पालखीचे आगमन होऊन येथे वारकºयांना सकाळचे भोजन देण्यात आले. काल्याचे कीर्तन होऊन श्रींची आरती झाली. यानंतर पालखी नगर परिक्रमासाठी निघाली. बाळापूर फैल, भुसावळ चौक, सरकी लाइन, मेन रोड, महावीर चौक, मित्र समाज छापखाना, शहर पोलीस स्टेशन रोड, नांदुरा रोडवरील टॉवर चौक, सिव्हिल लाइन, देशमुख प्लॉट, एकबोटे चौक, मेन रोड, फरशी येथून श्री संत गजानन महाराज मंदिर सुटाळपुरा येथे पोहचली.वारक-यांसाठी प्रसादाचे वाटपपायी दिंडीत सहभागी असणाºया वारकºयांसाठी ठिकठिकाणी भक्तांच्या वतीने चहा, दूध, केळी, फराळी चिवडा, शरबत, पाणी पाऊच, नारळ पाणी, वेफर्सचे पाकीट, जेवणाची भांडी ताट व ग्लास, पेढे, चिक्की, लाडू तसेच शिरा-पुरीचे जेवण देण्यात आले.शहा यांची श्रींच्या पालखीसोबत वारीशेगाव येथील रिक्षाचालक मेहबूब शहा सलग पाचव्या वर्षी लोणार ते शेगाव पायदळ वारी करीत असून, त्यांना गजानन विजय ग्रंथातील अनेक ओव्या मुखोद्गत आहेत. त्यामुळे सातासमुद्रापार पोहचलेल्या श्रींच्या भक्तीला आता धर्माचेही बंधन उरलेले नसल्याची प्रचिती येत आहे. श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असून, शनिवार २९ जुलै रोजी पालखीचे खामगावात आगमन झाले. सदर पालखीमध्ये शेगाव येथील कविमनाचे रिक्षाचालक मेहबूब शहा यांचाही सहभाग दिसून आाला. त्यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता मेहबूब शहा यांनी श्रींच्याविषयी त्यांच्या मनातील भक्तिभाव कथन केला. शेगाव रेल्वेस्टेशनवर रिक्षाचालक असणारे मेहबूब शहा हे भाविकांना संत गजानन महाराज मंदिर येथे पोहचून देण्याचे काम करतात. त्यामुळे ते स्वत:ला श्री संत गजानन महाराज व भाविकांमधील दुवा असल्याचे सांगतात. संत गजानन महाराजांविषयी श्रद्धा कशी काय निर्माण झाली, याबद्दल विचारणा केली असता मेहबूब शहा म्हणाले की, माझ्या आई-वडिलांनी गजानन महाराज हे अवलिया असल्याचे सांगितल्यापासूनच माझ्या मनात त्यांच्याविषयी भक्तिभाव रुजू झाला व तो उत्तरोत्तर वाढत गेला. सन २०१३ पासून आपण लोणार ते शेगाव पायदळ वारी गजानन महाराजांच्या पालखीसोबत करीत आहोत, असे सांगून त्यांनी गजानन विजय ग्रंथातील काही ओव्याही म्हणून दाखविल्या.