शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

श्रद्धेच्या पाहुणचाराने भारावले वारकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:00 IST

तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करून श्रींची पालखी पंढरपूर येथून परतीच्या वाटेने माहेरकडे निघाली आहे. या प्रवासात खामगाव हा श्रींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम शनिवारी असून, रजतनगरीतील भाविकांनी श्रींच्या पालखीसह सोबत असलेल्या शेकडो वारक-यांना श्रद्धेचा पाहुणचार केला.

ठळक मुद्देहजारो भाविकांनी केले ‘श्रीं’चे खामगावात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करून श्रींची पालखी पंढरपूर येथून परतीच्या वाटेने माहेरकडे निघाली आहे. या प्रवासात खामगाव हा श्रींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम शनिवारी असून, रजतनगरीतील भाविकांनी श्रींच्या पालखीसह सोबत असलेल्या शेकडो वारकºयांना श्रद्धेचा पाहुणचार केला. श्रींच्या पालखीचे शहरात विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, धार्मिक आणि युवक मंडळीच्या वतीने ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांची पायदळ वारी शेगाव येथून ११ जून रोजी पंढरपूरकडे रवाना झाली होती. आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करीत पालखी परतीच्या मार्गावर आहे. रजतनगरीत शनिवारी सकाळी अश्व, ध्वज व वारकरी बंधूंसह हरिनामाच्या जयघोषात व टाळ, मृदृंगाच्या गजरात श्रींच्या पालखीचे आगमन झाले. खामगाव बायपास रोडवरील हनुमान व्हिटामीन येथे पालखीचे आगमन होऊन येथे वारकºयांना सकाळचे भोजन देण्यात आले. काल्याचे कीर्तन होऊन श्रींची आरती झाली. यानंतर पालखी नगर परिक्रमासाठी निघाली. बाळापूर फैल, भुसावळ चौक, सरकी लाइन, मेन रोड, महावीर चौक, मित्र समाज छापखाना, शहर पोलीस स्टेशन रोड, नांदुरा रोडवरील टॉवर चौक, सिव्हिल लाइन, देशमुख प्लॉट, एकबोटे चौक, मेन रोड, फरशी येथून श्री संत गजानन महाराज मंदिर सुटाळपुरा येथे पोहचली.वारक-यांसाठी प्रसादाचे वाटपपायी दिंडीत सहभागी असणाºया वारकºयांसाठी ठिकठिकाणी भक्तांच्या वतीने चहा, दूध, केळी, फराळी चिवडा, शरबत, पाणी पाऊच, नारळ पाणी, वेफर्सचे पाकीट, जेवणाची भांडी ताट व ग्लास, पेढे, चिक्की, लाडू तसेच शिरा-पुरीचे जेवण देण्यात आले.शहा यांची श्रींच्या पालखीसोबत वारीशेगाव येथील रिक्षाचालक मेहबूब शहा सलग पाचव्या वर्षी लोणार ते शेगाव पायदळ वारी करीत असून, त्यांना गजानन विजय ग्रंथातील अनेक ओव्या मुखोद्गत आहेत. त्यामुळे सातासमुद्रापार पोहचलेल्या श्रींच्या भक्तीला आता धर्माचेही बंधन उरलेले नसल्याची प्रचिती येत आहे. श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असून, शनिवार २९ जुलै रोजी पालखीचे खामगावात आगमन झाले. सदर पालखीमध्ये शेगाव येथील कविमनाचे रिक्षाचालक मेहबूब शहा यांचाही सहभाग दिसून आाला. त्यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता मेहबूब शहा यांनी श्रींच्याविषयी त्यांच्या मनातील भक्तिभाव कथन केला. शेगाव रेल्वेस्टेशनवर रिक्षाचालक असणारे मेहबूब शहा हे भाविकांना संत गजानन महाराज मंदिर येथे पोहचून देण्याचे काम करतात. त्यामुळे ते स्वत:ला श्री संत गजानन महाराज व भाविकांमधील दुवा असल्याचे सांगतात. संत गजानन महाराजांविषयी श्रद्धा कशी काय निर्माण झाली, याबद्दल विचारणा केली असता मेहबूब शहा म्हणाले की, माझ्या आई-वडिलांनी गजानन महाराज हे अवलिया असल्याचे सांगितल्यापासूनच माझ्या मनात त्यांच्याविषयी भक्तिभाव रुजू झाला व तो उत्तरोत्तर वाढत गेला. सन २०१३ पासून आपण लोणार ते शेगाव पायदळ वारी गजानन महाराजांच्या पालखीसोबत करीत आहोत, असे सांगून त्यांनी गजानन विजय ग्रंथातील काही ओव्याही म्हणून दाखविल्या.