शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

खामगावकरांवर पाणी कपातीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:25 IST

खामगाव : खामगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ज्ञानगंगा प्रकल्पात केवळ २३ टक्के जलसाठा असून, पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या भविष्यात जाणवू शकते. त्यामुळे नगरपालिकेकडून पाण्याचे नियोजन करण्यात येत असून, यांतर्गत पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. त्यामुळे सध्या सातव्या दिवशी होत असलेला पाणीपुरवठा नवव्या दिवसावर जाऊ शकतो. तसेच पाणीपुरवठय़ाची वेळही कमी होऊ शकते.

ठळक मुद्देअपुर्‍या जलसाठय़ामुळे करावे लागणार नियोजन पाणीपुरवठा लांबण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : खामगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ज्ञानगंगा प्रकल्पात केवळ २३ टक्के जलसाठा असून, पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या भविष्यात जाणवू शकते. त्यामुळे नगरपालिकेकडून पाण्याचे नियोजन करण्यात येत असून, यांतर्गत पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. त्यामुळे सध्या सातव्या दिवशी होत असलेला पाणीपुरवठा नवव्या दिवसावर जाऊ शकतो. तसेच पाणीपुरवठय़ाची वेळही कमी होऊ शकते.खामगाव शहराला गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो; परंतु यावर्षी खामगावसह धरण परिसरात समाधानकारक पाऊस पडला नाही. संपूर्ण जिल्ह्यातच अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्ञानगंगा धरणासह बहुतांश धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे. ज्ञानगंगा धरणात फक्त २२.९६ टक्के एवढा जलसाठा असून, हा जलसाठा अपुरा असल्याचे दिसून येते. सध्या पिकांसाठी पावसाची नितांत गरज असताना पाऊस पडत नसल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची चिंता सतावू लागली आहे. धरणांमधील जलसाठय़ांवर अवलंबून असलेल्या विविध शहरांच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. खामगाव शहराची तहान भागविणार्‍या ज्ञानगंगा धरणात सुध्दा अपुरा जलसाठा असल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ शहरवासीयांवर येऊ शकते. भविष्यातील पाण्याची तजवीज करण्याकरिता पाणी कपातीसारखा कटू निर्णय पालिकेला घ्यावा लागणार आहे. परिणामी, पाणीपुरवठय़ाचा कालावधी लांबणे, पाणीपुरवठय़ाची वेळ कमी होणे अशा निर्णयांना सामोरे जाण्याची वेळसुद्धा शहरवासीयांवर येऊ शकते. 

पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरजसंपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असून, पाऊस नसल्याने शेतकर्‍यांसोबतच व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिक धास्तावलेले आहेत. किमान पिण्यासाठी तरी पुरेसे पाणी मिळणार की नाही, अशी चिंता शहरवासीयांना सतावत आहे. त्यामुळे भविष्यात बिकट स्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, किंबहुना पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी, याकरिता नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे बनले आहे. पावसाळ्यात जलसंधारणाच्या कामांकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत आग्रह धरला जात नाही. त्यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदण्याची वेळ उन्हाळ्यात येत असते.

सध्या उपलब्ध जलसाठय़ाचा वापर जपून करणे गरजेचे आहे. याकरिता नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात येत असून, पाणी कपातीचा विचार सुरू आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला, तरी भविष्यात तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे शहरवासीयांनी पाण्याचा वापर जपून करावा व या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. -सतीशआप्पा दुडे, सभापती, पाणीपुरवठा विभाग