शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव शहराच्या पाणीपुरवठय़ातील अडथळा दूर!

By admin | Updated: November 19, 2014 01:21 IST

जलशुद्धीकरण केंद्रासाठी टेंभूर्णा येथे विभागीय आयुक्तांकडून परवानगी.

खामगाव (बुलडाणा): शहरासाठी संजीवनी ठरणार्‍या वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रासाठी अमरावती विभागीय आयुक्तांकडून जमिनीचा ताबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या तहानेतील मोठा अडसर आता दूर झाला आहे. तथापि, या जागेच्या मोबदल्यात पालिकेला ५३ लक्ष रुपये मोजावी लागणार असल्याची माहिती आहे.सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराला ज्ञानगंगा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी वामन नगर येथे १७ लाख लिटर तर घाटपुरीमध्ये २१ लाख लिटर पाण्याची क्षमता असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत, तर खामगाव शहरात या दोन टाक्यावरून जवळपासच्या भागात पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठा अत्यल्प असल्याने नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव निदर्शनास आल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ६२ कोटी रुपयाची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. गेल्या चार-साडेचार वर्षांंपासून या योजनेचे शिर्ला येथील मन प्रकल्पातून काम सुरू असून योजनेवर ७0 टक्के खर्च करण्यात आला आहे; मात्र या योजनेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम जागेअभावी रखडले होते. दरम्यान, पालिकेच्या महत प्रयत्नांती जलशुद्धीकरण केंद्रासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातून जागेचा ताबा मंजूर करण्यात आला आहे; परंतु यासाठी पालिकेला तब्बल ५३ लक्ष रुपयांची किंमत मोजावी लागणार आहे. खामगाव नगरअध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी पाणी टंचाईस प्रथम प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट केले. जमिनीचा आगाऊ ताबा मंजूर करण्यासाठी प्रशासनाने ५३ लक्ष रुपये किंमत निश्‍चित केली आहे. ही किंमत कमी करण्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहारास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केली.