शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

खामगाव: केळी उत्पादकांचा प्रश्न सुटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 11:15 IST

जिल्ह्यात ४७२ हेक्टरवर केळीची लागवड करण्यात आली आहे.

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या नियोजनाचा लाभ भाजीपाला तसेच इतर फळांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना झाला असला, तरी केळी उत्पादकांचा प्रश्न अद्यापही सुटला नसल्याचे दिसून येते. कृषी विभागाकडून मात्र याबाबत नियोजन करणे सुरू आहे.कोरोना आजारामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनचा फटका शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर बसला. इतर उत्पादनांच्या तुलनेत भाजीपाला, फळे उत्पादने जास्त काळ टिकत नसल्याने नुकसानाचा धोकाच जास्त आहे. दुसरीकडे जिल्ह्यात स्टोअरेजचीही व्यवस्था नसल्याने आलेले उत्पादन विकण्याखेरीज शेतकºयांकडे दुसरा पर्याय नाही. परिणामी शेतकºयांना आर्थिक नुकसानाचा धोकाच अधिक आहे. दरम्यान शेतकºयांचा हा विषय लक्षात घेता, जिल्ह्यात कृषी विभागाने नियोजन करत शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यात भाजीपाला, कांदा, द्राक्ष, मोसंबीची मोठ्या प्रमाणावर जिल्हयातच विक्री करण्यात आली. कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शेतकºयांसोबत उपस्थित राहत शेकडो क्विंटल मालाची विक्री करून दिली. असे असताना, केळी उत्पादक शेतकºयांचा प्रश्न मात्र अद्यापही सुटलेला दिसत नाही. जिल्ह्यात ४७२ हेक्टरवर केळीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो क्विंटल माल सध्या परिपक्व अवस्थेत आहे. परंतु वाहतूक व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणावर सुरू नसल्याने केळी विक्रीची व्यवस्था होवू शकलेली नाही.राज्याबाहेर विक्रीचे भिजत घोंगडे!दिल्लीसह परराज्यात केळीची मागणी बघता बुलडाणा जिल्ह्यातून माल पाठविता येवू शकतो का, याबाबत नाफेडकडून कृषी विभागातील अधिकाºयांना विचारणा करण्यात आली होती. या प्रक्रियेत रेल्वे विभागाकडूनही मालाच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला होता. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालाची आवक नसणे तसेच शेतकºयांना अपेक्षित भाव मिळणार नसल्याचे यातून समोर आले. परिणामी हा विषय अजुनही पुढे सरकलेला नाही.

शेतकºयांनीच व्हावे व्यापारी!लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती बघता, ज्या प्रमाणे शेतकºयांनी भाजीपाला तसेच इतर फळ पिकांची जिल्ह्यात विक्री केली; तसेच केळीचेही नियोजन करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने शेतकºयांसमोर ठेवला. यात शेतकºयांनी स्वत:च केळी पिकवून त्याची विक्री करावी, यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी त्यांना सहकार्य करतील, असे सांगण्यात आले, मात्र याला प्रतिसाद मिळू शकला नाही.

केळी उत्पादकांचा प्रश्न सोडविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशिल आहे. यातून निश्चितच तोडगा काढण्यात येईल.-नरेंद्र नाईकजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती