शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

खामगावचा पाणी पुरवठा वांध्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:46 IST

खामगाव : सततच्या भारनियमनामुळे खामगाव शहराचा पाणी  पुरवठा वांद्यात सापडला आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या  गेरू माटरगाव धरण क्षेत्रात दररोज ६ तास भारनियमन होत  असून याचा विपरीत परिणाम पाणी पुरवठय़ावर होताना दिसत  आहे. त्यामुळे ऐन सण उत्सवाच्या काळात खामगावकरांना  पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देगेरू माटरगाव धरण क्षेत्रात दररोज ६ तास लोडशेडिंगपालिकेचे तिसर्‍यांदा वीज वितरणला स्मरणपत्र!

खामगाव : सततच्या भारनियमनामुळे खामगाव शहराचा पाणी  पुरवठा वांद्यात सापडला आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या  गेरू माटरगाव धरण क्षेत्रात दररोज ६ तास भारनियमन होत  असून याचा विपरीत परिणाम पाणी पुरवठय़ावर होताना दिसत  आहे. त्यामुळे ऐन सण उत्सवाच्या काळात खामगावकरांना  पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.गत काही दिवसांपासून सर्वत्र भारनियमनाचा त्रास सुरू आहे.  खामगाव शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गेरू माटरगाव धरण  परिसरातही दररोज ६ तास भारनियमन होत आहे. सकाळी ३ व  सायंकाळी ३ तास अशा दोन वेळेत हे भारनियमन केले जात  आहे. मात्र या भारनियमनाचा जास्त त्रास खामगावकरांना सहन  करावा लागत आहे. गेरू माटरगाव धरणावरून शहरातील  पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी येण्यासाठी ४ तासाचा वेळ लागतो.  त्यामुळे भारनियमनाचे ३ तास व पाणी येण्यासाठी लागणारे ४  तास असे एकुण ७ तास वाया जातात. दिवसातून दोन वेळा ३-३  तास भारनियमन होत असल्याने २४ तासातील १४ तास व्यर्थ  जात आहेत. उर्वरीत १0 तासातच पंपींग होते. शहराची आजची  पाण्याची गरज लक्षात घेता दररोज किमान २0 तास पंपींग होणे  आवश्यक आहे. मात्र भारनियमनामुळे हा कालावधी अध्र्यात  आला आहे. यामुळे शहराचा पाणी पुरवठा प्रभावित होताना  दिसत आहे. आधीच १0 दिवसावर पोहचलेल्या पाणी पुरवठय़ा त भारनियमनामुळे आणखी विलंब होत आहे. आधी  पावसाअभावी धरणात पाणी नसल्याने शहरवासीयांसमोर  जलसंकट उभे राहिले होते. परतीच्या पावसात गेरू माटरगाव  धरणात पाणी आल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र पाणी  असतानाही लोडशेडींगमुळे खामगावकरांना पाण्यासाठी त्रास हो त आहे. 

पालिकेचे तिसर्‍यांदा वीज वितरणला स्मरणपत्र!-खामगाव शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गेरू माटरगाव धरण  क्षेत्रात भारनियमन रद्द करावे या मागणीचे पत्र आज पुन्हा  पालिकेने वीज वितरणला दिले आहे. हे पालिकेचे तिसरे पत्र  असून अद्याप भारनियमन बंद झालेले नाही. -एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराच्या  पाणी पुरवठय़ात भारनियमनामुळे वेळोवेळी व्यत्यय येत आहे.  त्यामुळे पाण्यासाठी खामगावकरांचा उद्रेक झाल्यास याला वीज  वितरण जबाबदार असेल, असे सदर पत्रात नमूद असल्याची  माहिती आहे.-वारंवार सूचना देवूनही पालिका प्रशासनाच्या पत्राला वीज वि तरणकडून केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे दिसते.