वाहन चालविण्यासाठी वयाची किमान १८ वर्षे पूर्ण असावीत, असा नियम घालून दिलेला असताना, याकडे मात्र सर्रास दुर्लक्ष केल्या जात आहे. हा नियम केवळ कागदावरच उरला आहे. मुख्य रस्त्यावर गर्दी असतानाही सुसाट वेगात दुचाक्या चालविणारे अप्रशिक्षित अल्पवयीन चालक कुणाचीही भीती न बाळगता राजरोसपणे दुचाकीवर फिरताना दिसत आहेत. मात्र, याकडे साफ कानाडोळा होतो आहे.
असा आहे नियम...
५० सी.सी. क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेची गाडी चालविताना अल्पवयीन चालक, विना परवाना वाहन चालविणे आणि आरटीओकडे नोंदणी न करता वाहन चालविणे आदी कारणांसाठी कलम २७०(१) नुसार कारवाईस पात्र ठरतो आणि यामध्ये २ हजार रुपयांपर्यंत दंडाची रक्कम आकारली जाते, तसेच दंड न भरल्यास गाडी जप्तीची कारवाईही होते. ही कारवाई वाहतूक विभागाकडून केली जाते. मात्र, वाहतूक विभागही निरुत्साही दिसत आहे.