शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

खरीप हंगामावर काेराेनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

किनगाव जट्टू : गत वर्षापासून काेराेना संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. ...

किनगाव जट्टू : गत वर्षापासून काेराेना संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. पीक कर्जही मिळत नसल्याने खरीप हंगामातील पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्राेत्साहन अनुदान देण्याची घाेषणा केली हाेती, मात्र तीही मिळाली नसल्याचे चित्र आहे.

गतवर्षीपासून कोरोना संसर्ग आजाराचे संकट कायम आहे. गतवर्षी मूग, उडीद पिकाच्या शेंगा तोडणीला आलेल्या असतानाच अतिवृष्टी झाल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. या नुकसानीचे सर्वेक्षणही करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. पेरलेले सोयाबीन उगवले नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. तसेच सोयाबीन सोंगणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विमा काढला होता, परंतु नुकसानभरपाई मिळाली नाही. अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याचे दिसत नसल्याने त्यांना पीक कर्ज मिळत नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. या महिन्यात शेतकरी किसान सन्मान योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले, परंतु काही शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित आहे.

शेतमाल घरातच पडून

फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत आहे. एप्रिल महिन्यापासून शासनाने निर्बंध लावल्याने शेतमाल घरातच पडून आहे. संचारबंदी असल्याने अनेक व्यापारी गावाकडे फिरकलेच नाही. निसर्गाचा लहरीपणा, कोरोना महामारीचे संकट अशा विविध अडचणींमुळे किनगाव जट्टू परिसरातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरणी अडचणीत सापडली आहे. यावर्षीचा खरीप हंगामाला अवघ्या आठवडाभराचा कालावधी शिल्लक असल्याने पीकविमा तसेच नुकसानभरपाईची रक्कम त्वरित मिळावी तसेच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी हाेत आहे.