शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

खरीप हंगामावर काेराेनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

किनगाव जट्टू : गत वर्षापासून काेराेना संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. ...

किनगाव जट्टू : गत वर्षापासून काेराेना संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. पीक कर्जही मिळत नसल्याने खरीप हंगामातील पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्राेत्साहन अनुदान देण्याची घाेषणा केली हाेती, मात्र तीही मिळाली नसल्याचे चित्र आहे.

गतवर्षीपासून कोरोना संसर्ग आजाराचे संकट कायम आहे. गतवर्षी मूग, उडीद पिकाच्या शेंगा तोडणीला आलेल्या असतानाच अतिवृष्टी झाल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. या नुकसानीचे सर्वेक्षणही करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. पेरलेले सोयाबीन उगवले नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. तसेच सोयाबीन सोंगणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विमा काढला होता, परंतु नुकसानभरपाई मिळाली नाही. अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याचे दिसत नसल्याने त्यांना पीक कर्ज मिळत नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. या महिन्यात शेतकरी किसान सन्मान योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले, परंतु काही शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित आहे.

शेतमाल घरातच पडून

फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत आहे. एप्रिल महिन्यापासून शासनाने निर्बंध लावल्याने शेतमाल घरातच पडून आहे. संचारबंदी असल्याने अनेक व्यापारी गावाकडे फिरकलेच नाही. निसर्गाचा लहरीपणा, कोरोना महामारीचे संकट अशा विविध अडचणींमुळे किनगाव जट्टू परिसरातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरणी अडचणीत सापडली आहे. यावर्षीचा खरीप हंगामाला अवघ्या आठवडाभराचा कालावधी शिल्लक असल्याने पीकविमा तसेच नुकसानभरपाईची रक्कम त्वरित मिळावी तसेच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी हाेत आहे.