शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

खरीप हंगामावर काेराेनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

किनगाव जट्टू : गत वर्षापासून काेराेना संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. ...

किनगाव जट्टू : गत वर्षापासून काेराेना संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. पीक कर्जही मिळत नसल्याने खरीप हंगामातील पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्राेत्साहन अनुदान देण्याची घाेषणा केली हाेती, मात्र तीही मिळाली नसल्याचे चित्र आहे.

गतवर्षीपासून कोरोना संसर्ग आजाराचे संकट कायम आहे. गतवर्षी मूग, उडीद पिकाच्या शेंगा तोडणीला आलेल्या असतानाच अतिवृष्टी झाल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. या नुकसानीचे सर्वेक्षणही करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. पेरलेले सोयाबीन उगवले नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. तसेच सोयाबीन सोंगणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विमा काढला होता, परंतु नुकसानभरपाई मिळाली नाही. अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याचे दिसत नसल्याने त्यांना पीक कर्ज मिळत नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. या महिन्यात शेतकरी किसान सन्मान योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले, परंतु काही शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित आहे.

शेतमाल घरातच पडून

फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत आहे. एप्रिल महिन्यापासून शासनाने निर्बंध लावल्याने शेतमाल घरातच पडून आहे. संचारबंदी असल्याने अनेक व्यापारी गावाकडे फिरकलेच नाही. निसर्गाचा लहरीपणा, कोरोना महामारीचे संकट अशा विविध अडचणींमुळे किनगाव जट्टू परिसरातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरणी अडचणीत सापडली आहे. यावर्षीचा खरीप हंगामाला अवघ्या आठवडाभराचा कालावधी शिल्लक असल्याने पीकविमा तसेच नुकसानभरपाईची रक्कम त्वरित मिळावी तसेच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी हाेत आहे.