शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

काेराेनामुळे १८ बालकांचा आधार हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST

बुलडाणा : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक गावांमध्ये कुटुंबच संपल्याचे चित्र आहे. काेराेना महामारीने ...

बुलडाणा : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक गावांमध्ये कुटुंबच संपल्याचे चित्र आहे. काेराेना महामारीने बालकांनाही फटका बसला असून, जिल्ह्यातील १८ बालकांचा आधार हिरावला आहे. यामध्ये चार बालकांचे दाेन्ही पालक, तर १४ बालकांतील एका पालकाचे निधन झाले आहे.

कोरोना काळात जिल्हा कृती दलामार्फत एकूण १८ बालकांचा शोध घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये ०४ बालकांना आई-वडील नाहीत. या मध्ये २ मुली व २ मुलांचा समावेश आहे. १४ बालके ही कोरोनामुळे एक पालक झालेली आढळून आलेली आहेत, ज्या मध्ये ८ मुली व ६ मुले आढळून आलेली आहेत. या बालकांची प्राथमिक चौकशी सुरू असून, त्यांना बाल कल्याण समितीमार्फत पुढील पुनर्वसनासाठी हजर करण्यात येणार आहे. कोरोनामुळे नातेवाईक आणि पालक यांचा रोजगार आणि व्यवसाय सुरळीत सुरू नसल्याने या बालकांना शिक्षण आणि उपजीविकेसाठी आर्थिक मदत लागणार असल्याचे कळाले आहे.

ज्या व्यक्ती व सामाजिक कार्यात अग्रेसर संस्था आहेत, ज्यांना अशा बालकांना मदत करायची आहे, त्यांनी बालकांना परस्पर मदत न देता अशा संस्था किंवा व्यक्ती यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जेणेकरून अशा व्यक्ती किंवा संस्थांना बाल न्याय अधिनियमातील तरतुदीनुसार योग्य व्यक्ती किंवा संस्था म्हणून घोषित करण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संकटग्रस्त अशा बालकांची निवास गरजा, शिक्षण आणि मूलभूत गरजा व संपत्तीचे अधिकार आणि सर्वांगीण काळजी आणि संरक्षणासाठीची व्यवस्था बाल कल्याण समितीमार्फत होत असल्याने बालकांना परस्पर ताब्यात न घेता, त्याला बाल कल्याण समितीमार्फत पुनर्वसन सेवा देण्याचे आवाहन बालकांसाठी असणाऱ्या जिल्हा कृती दल आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

दत्तक घेण्याच्या पाेस्ट व्हायरल

कोविडच्या महामारीच्या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना बेकायदेशीररीत्या दत्तक वा त्याच्या विक्रीच्या पोस्ट सध्या समाजमाध्यमातून व्हायरल होत आहेत. वस्तुतः असे मुलांना दत्तक घेता येत नाही. अशा प्रकारामध्ये काही दृष्टप्रवृत्ती असू शकतात. त्यामुळे प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. जिल्हास्तरावर ० ते १८ वयोगटातील बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी बाल कल्याण समितीची स्थापना बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २०१५ अंतर्गत करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या बालकांना मदतीची गरज आहे, त्यांनी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत घोषित करण्यात आलेल्या मदत क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.