शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

ज्वारी, मका, तुरीचे उत्पादन घटणार

By admin | Updated: June 28, 2015 23:19 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पेरणी पावसाआभावी खोळंबली; तृणधान्य व कडधान्य पिकांची सरासरी १६ टक्के पेरणी.

बुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी ७.४२ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन आहे. यात नगदी उत्पन्न देणार्‍या तृणधान्य व कडधान्यासाठी एकूण २ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे; मात्र पावसाआभावी या पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही, तरी जिल्ह्यात तृणधान्य व कडधान्याची पिके घटण्याचे संकेत आहेत. दरम्यान, आजपर्यंत सरासरी १६ टक्के पेरणी आटोपली आहे. गतवर्षी अतवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांना मोठा फटका बसला. याशिवाय अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे सोयाबीन व कापूस पिकांचे जास्त नुकसान झाले. अशावेळी शेतकर्‍यांना तृणधान्य व कडधान्याचा मोठा आधार लाभला होता. यातून बर्‍यापैकी उत्पन्न मिळल्याने शेतकरी यंदाच्या खरीप हंगामासाठी तयार राहू शकला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनात कृषी विभागाने या पिकांच्या पेरणीकडे लक्ष दिले. जिल्ह्यात खरिपाची पेरणी ७ लाख ४२ हजार ८९३ हेक्टर क्षेत्रावर होत आहे. यात ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यासाठी १ लाख २१ हजार १00 हेक्टर, तर तूर, मूग, उडीद या कडधान्यासाठी १ लाख ६६ हजार ५00 हेक्टरचे नियोजन आहे; मात्र जून महिन्याच्या शेवटपर्यंत तृणधान्याची १३ हजार आणि कडधान्याची ४४ हजार हेक्टरवर पेरणी होऊ शकली. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आर्थिक व मानसिकरीत्या खचलेला शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.