शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘जिगाव’ ६९८ कोटींवरून १३,८७४ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST

बुलडाणा : पश्चिम विदर्भाचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची क्षमता असलेल्या जिगाव प्रकल्पाची किंमत आता १३,८७४ कोटींवर गेली आहे. दरम्यान, ...

बुलडाणा : पश्चिम विदर्भाचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची क्षमता असलेल्या जिगाव प्रकल्पाची किंमत आता १३,८७४ कोटींवर गेली आहे. दरम्यान, आतापर्यंत प्रकल्पावर ४०१९ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ९७७५ कोटी रुपयांची आणखी अवश्यकता आहे. सध्या जिगाव प्रकल्पासह आलेवाडी, अरकचेरी आणि चौंढी हे तीन, असे चार प्रकल्प रखडलेले असून, २०२५ पर्यंत या प्रकल्पांचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे. अन्यथा या प्रकल्पांची किंमत सातत्याने वाढत जाणार आहे. प्रामुख्याने १९९५ दरम्यान ६९८ कोटी रुपये किंमत असलेल्या जिगाव प्रकल्पाची आता चौथ्या सुप्रमानंतर किंमत १३ हजार ८७४ कोटी रुपये झाली आहे. निधी वाटपाचे सूत्र आणि बळीराजा संजीवनी प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणारा निधी हा तोकडा असल्याने हा प्रकल्प अशाच धीम्या गतीने सुरू राहिला तर आणखी २० वर्षे हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास लागतील. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामांना वेग देऊन राज्यपालांच्या निधी वाटपाच्या सूत्राच्या पलीकडे जाऊन निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे फेब्रुवारी महिन्यात बुलडाणा येथे संघटनात्मक कार्यासाठी आले असता ‘लोकमत’शी बोलताना सांगितले होते. या प्रकल्पाच्या सांडव्याचे काम ८० टक्के झाले आहे. बुडीत क्षेत्रातील १७ हजार१३८ हेक्टरपैकी अजूनही १२ हजार हेक्टर जमिनीचे संपादन बाकी आहे. प्रकल्प पुनर्वसनाची सध्या फक्त २५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. पुनर्वसन मार्गी लावावयाचे असल्यास आणखी तीन हजार कोटी रुपयांची गरज आहे. मर्यादित स्वरूपात प्रकल्पात पाणी साठवावयाचे असल्यासही प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील जवळपास २२ गावांचे पुनर्वसन गरजेचे आहे.

--आलेवाडी प्रकल्प--

आलेवाडी प्रकल्प २०५ कोटी ६१ लाख रुपयांचा असून, या प्रकल्पावर आतापर्यंत ८५ कोटी ३२ लाख रुपये खर्च झाला आहे. प्रकल्पासाठी आणखी १२० कोटी २९ लाख रुपयांची गरज आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास ७५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

--अरकचेरी प्रकल्प--

या प्रकल्पाची सिंचन क्षमता १,१६८ हेक्टर आहे. हा प्रकल्पही २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २७७.८५ कोटी रुपयांची गरज आहे. पैकी आतापर्यंत केवळ ५५ कोटी पाच लाख रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत.

--चौंढी--

चौंढी प्रकल्पाची एकूण किंमत १९० कोटी एक लाख रुपये आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत १११ कोटी ४८ लाख रुपये खर्च झाला आहे. हा प्रकल्पही २०२३ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. प्रकल्पामुळे ९५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. गेल्या पाच ते सात वर्षांपासून हे तिन्ही प्रकल्प रखडलेले असून, जळगाव जामोद व संग्रामपूर या आदिवासी तालुक्यातील हे प्रकल्प आहेत.