शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

‘जिगाव’ ६९८ कोटींवरून १३,८७४ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST

बुलडाणा : पश्चिम विदर्भाचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची क्षमता असलेल्या जिगाव प्रकल्पाची किंमत आता १३,८७४ कोटींवर गेली आहे. दरम्यान, ...

बुलडाणा : पश्चिम विदर्भाचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची क्षमता असलेल्या जिगाव प्रकल्पाची किंमत आता १३,८७४ कोटींवर गेली आहे. दरम्यान, आतापर्यंत प्रकल्पावर ४०१९ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ९७७५ कोटी रुपयांची आणखी अवश्यकता आहे. सध्या जिगाव प्रकल्पासह आलेवाडी, अरकचेरी आणि चौंढी हे तीन, असे चार प्रकल्प रखडलेले असून, २०२५ पर्यंत या प्रकल्पांचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे. अन्यथा या प्रकल्पांची किंमत सातत्याने वाढत जाणार आहे. प्रामुख्याने १९९५ दरम्यान ६९८ कोटी रुपये किंमत असलेल्या जिगाव प्रकल्पाची आता चौथ्या सुप्रमानंतर किंमत १३ हजार ८७४ कोटी रुपये झाली आहे. निधी वाटपाचे सूत्र आणि बळीराजा संजीवनी प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणारा निधी हा तोकडा असल्याने हा प्रकल्प अशाच धीम्या गतीने सुरू राहिला तर आणखी २० वर्षे हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास लागतील. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामांना वेग देऊन राज्यपालांच्या निधी वाटपाच्या सूत्राच्या पलीकडे जाऊन निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे फेब्रुवारी महिन्यात बुलडाणा येथे संघटनात्मक कार्यासाठी आले असता ‘लोकमत’शी बोलताना सांगितले होते. या प्रकल्पाच्या सांडव्याचे काम ८० टक्के झाले आहे. बुडीत क्षेत्रातील १७ हजार१३८ हेक्टरपैकी अजूनही १२ हजार हेक्टर जमिनीचे संपादन बाकी आहे. प्रकल्प पुनर्वसनाची सध्या फक्त २५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. पुनर्वसन मार्गी लावावयाचे असल्यास आणखी तीन हजार कोटी रुपयांची गरज आहे. मर्यादित स्वरूपात प्रकल्पात पाणी साठवावयाचे असल्यासही प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील जवळपास २२ गावांचे पुनर्वसन गरजेचे आहे.

--आलेवाडी प्रकल्प--

आलेवाडी प्रकल्प २०५ कोटी ६१ लाख रुपयांचा असून, या प्रकल्पावर आतापर्यंत ८५ कोटी ३२ लाख रुपये खर्च झाला आहे. प्रकल्पासाठी आणखी १२० कोटी २९ लाख रुपयांची गरज आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास ७५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

--अरकचेरी प्रकल्प--

या प्रकल्पाची सिंचन क्षमता १,१६८ हेक्टर आहे. हा प्रकल्पही २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २७७.८५ कोटी रुपयांची गरज आहे. पैकी आतापर्यंत केवळ ५५ कोटी पाच लाख रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत.

--चौंढी--

चौंढी प्रकल्पाची एकूण किंमत १९० कोटी एक लाख रुपये आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत १११ कोटी ४८ लाख रुपये खर्च झाला आहे. हा प्रकल्पही २०२३ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. प्रकल्पामुळे ९५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. गेल्या पाच ते सात वर्षांपासून हे तिन्ही प्रकल्प रखडलेले असून, जळगाव जामोद व संग्रामपूर या आदिवासी तालुक्यातील हे प्रकल्प आहेत.