शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘जिगाव’ ६९८ कोटींवरून १३,८७४ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST

बुलडाणा : पश्चिम विदर्भाचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची क्षमता असलेल्या जिगाव प्रकल्पाची किंमत आता १३,८७४ कोटींवर गेली आहे. दरम्यान, ...

बुलडाणा : पश्चिम विदर्भाचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची क्षमता असलेल्या जिगाव प्रकल्पाची किंमत आता १३,८७४ कोटींवर गेली आहे. दरम्यान, आतापर्यंत प्रकल्पावर ४०१९ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ९७७५ कोटी रुपयांची आणखी अवश्यकता आहे. सध्या जिगाव प्रकल्पासह आलेवाडी, अरकचेरी आणि चौंढी हे तीन, असे चार प्रकल्प रखडलेले असून, २०२५ पर्यंत या प्रकल्पांचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे. अन्यथा या प्रकल्पांची किंमत सातत्याने वाढत जाणार आहे. प्रामुख्याने १९९५ दरम्यान ६९८ कोटी रुपये किंमत असलेल्या जिगाव प्रकल्पाची आता चौथ्या सुप्रमानंतर किंमत १३ हजार ८७४ कोटी रुपये झाली आहे. निधी वाटपाचे सूत्र आणि बळीराजा संजीवनी प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणारा निधी हा तोकडा असल्याने हा प्रकल्प अशाच धीम्या गतीने सुरू राहिला तर आणखी २० वर्षे हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास लागतील. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामांना वेग देऊन राज्यपालांच्या निधी वाटपाच्या सूत्राच्या पलीकडे जाऊन निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे फेब्रुवारी महिन्यात बुलडाणा येथे संघटनात्मक कार्यासाठी आले असता ‘लोकमत’शी बोलताना सांगितले होते. या प्रकल्पाच्या सांडव्याचे काम ८० टक्के झाले आहे. बुडीत क्षेत्रातील १७ हजार१३८ हेक्टरपैकी अजूनही १२ हजार हेक्टर जमिनीचे संपादन बाकी आहे. प्रकल्प पुनर्वसनाची सध्या फक्त २५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. पुनर्वसन मार्गी लावावयाचे असल्यास आणखी तीन हजार कोटी रुपयांची गरज आहे. मर्यादित स्वरूपात प्रकल्पात पाणी साठवावयाचे असल्यासही प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील जवळपास २२ गावांचे पुनर्वसन गरजेचे आहे.

--आलेवाडी प्रकल्प--

आलेवाडी प्रकल्प २०५ कोटी ६१ लाख रुपयांचा असून, या प्रकल्पावर आतापर्यंत ८५ कोटी ३२ लाख रुपये खर्च झाला आहे. प्रकल्पासाठी आणखी १२० कोटी २९ लाख रुपयांची गरज आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास ७५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

--अरकचेरी प्रकल्प--

या प्रकल्पाची सिंचन क्षमता १,१६८ हेक्टर आहे. हा प्रकल्पही २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २७७.८५ कोटी रुपयांची गरज आहे. पैकी आतापर्यंत केवळ ५५ कोटी पाच लाख रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत.

--चौंढी--

चौंढी प्रकल्पाची एकूण किंमत १९० कोटी एक लाख रुपये आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत १११ कोटी ४८ लाख रुपये खर्च झाला आहे. हा प्रकल्पही २०२३ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. प्रकल्पामुळे ९५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. गेल्या पाच ते सात वर्षांपासून हे तिन्ही प्रकल्प रखडलेले असून, जळगाव जामोद व संग्रामपूर या आदिवासी तालुक्यातील हे प्रकल्प आहेत.