शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

जननी सुरक्षा योजनेचे अनुदान रखडले!

By admin | Updated: May 1, 2017 01:41 IST

नांद्रा- जननी सुरक्षा योजने अंतर्गत सात दिवसात दिले जाणारे अनुदान दोन ते तीन वषार्नंतरही मिळाले नसल्याने वंचित महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची तक्रार केली आहे.

जि.प. अध्यक्षांकडे तक्रार : अधिकाऱ्यांचे होते दुर्लक्षनांद्रा : लोणार तालुक्यातील आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जननी सुरक्षा योजने अंतर्गत सात दिवसात दिले जाणारे अनुदान दोन ते तीन वषार्नंतरही मिळाले नसल्याने वंचित महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची तक्रार केली आहे. जिल्हापरिषद अध्यक्ष यांना प्रत्येक वंचित महिला पत्र पाठविणार असुन जननी सुरक्षेचा लाभ त्वरित मिळावा व या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाइ करावी, अशी मागणी होत आहे. आजचे बालक उद्याचे देशाचे भविष्य आहेत. यामुळे बाळ व त्यांना जन्म देणारी आई दोघे तंदुरूस्त असने आवश्यक असल्याने शासनाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी, या उदद्ेशाने माताना प्रसुतीच्या काळात जननी सुरक्षा योजनेंतर्गत मातृत्व अनुदान म्हणुन दिली जाणारी आर्थिक मदत दोन ते तीन वर्षा नंतरही मिळाली नसल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. थकित रक्कम त्वरित मिळावी, यासाठी अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या आरोग्य विभागाला जाग तरी कसा येणार. यामुळे आता महिलांनीच याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून व जिल्हापरिषद अध्यक्षा यांना प्रत्येक वंचित महिला पत्र पाठवुन आरोग्य विभागाच्या गलथान कारभार त्यांच्या निदर्शनास आनुन दिला आहे. शासनाकडुन मिळणारीही आर्थिक मदत आवश्यक त्या वेळेत मिळत नसल्याने त्याचा काहीच फायदा होत नसुन त्यासाठी महिलांना वर्षानुवर्षे बँकेचे उंबरठे झिजवावे लागतात व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हापरिषद अध्यक्ष ह्या महिला असल्याने त्यांना हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, याच उदद्ेशाने या वंचित महिलांनी हा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी दिव्या कडुजी मोरे, हिना सुनिल भोसले, प्रियंका शेषराव भोसले, पंचशिला जगदिश नरवाडे, भारती परमेश्वर काळे व रूपाली रामदास नरवाडे, स्वप्ना राजेश अंभोरे, यमुना मदन वाणी, संगिता अरूण कांबळे ,पुनम एकनाथ फुपाटे, नांद्रा येथिल अशा प्रत्येक गावातील वंचित महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे व जि.प पत्र पाठविले आहेत. अधिकारी करतात मनमानी कारभारगरिबीमुळे प्रसुत काळात आवश्यक तो आहार व आराम मिळत नसल्याने बालक व माता दोघे ही विविध आजाराचे शिकार होतात. मागील महिण्यात याच अनुदानासाठी महिलांनी तत्कालीन जिल्हापरिषद अध्यक्षा अलकाताई खंडारे यांची भेट घेवून जननी सुरक्षेचे अनुदान मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तेव्हा त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडनी केली आणि त्याच दिवशी अनुदान खात्यात जमा झाले. यावरून आरोग्य विभागाचे अधिकारीच मनमानी करून त्रास देतात हे स्पष्ट होते.