शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जांबुवंतीचा कोंडला श्वास; नदीला तीर्थात कधी बदलणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:39 IST

चिखली : शहरातील पावसाचे व सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेली एकमेव नदी ‘जांबुवंती’ नदीचा श्वास प्रदूषणामुळे कोंडला जात असल्याचे चित्र ...

चिखली : शहरातील पावसाचे व सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेली एकमेव नदी ‘जांबुवंती’ नदीचा श्वास प्रदूषणामुळे कोंडला जात असल्याचे चित्र आहे. पर्यायाने या नदीतून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याला दर्प घेण्याची वेळ आहे. याकडे कृषीमित्र तथा माजी नगरसेवक सचिन बोंद्रे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. तथापि नदीची ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानसही व्यक्त केला आहे.

आजघडीला आपल्या कामाच्या व्यापातही सर्वांशी संपर्कात राहण्याचे मोठे माध्यम म्हणजेच समाजमाध्यमे बनली आहेत. याच समाजमाध्यमाचा खुबीने वापर करीत सचिन बोंद्रे यांनी शहरातील जांबुवंती नदीच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. मध्यंतरी खोलीकरण व रूंदीकरणामुळे खळाळून वाहणारी ही नदी घाण, कचरा व जलपर्णी व इतर झाडाझुडुपांमुळे लुप्त झाल्यासारखी वाटत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शहरातील सांडपाणी व पावसाचे पाणी ही नदी वाहून नेते. परंतु, प्रदुषणाचा कळस गाठल्या गेल्याने या नदीतून पाणी हव्या त्या प्रमाणात वाहून जात नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून राहत असल्याने दुर्गंधीयुक्त या पाण्याचा उग्र दर्प येत आहे. याच समस्येकडे बोंद्रे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

नदी म्हणजे गावाची ओळख

भारत देशात अनेक काव्य, ग्रंथ, उपनिषद हे नदीवर रचलेले आहे. एवढे मोठे नदीचे महत्त्व असताना शहरातील एकमेव जांबुवंती नदीच्या रूपाने दैवी संचित असणारी आणि देवत्व घेऊन वाहणारी नदी प्रदूषित कशी होते ? याला जबाबदार कोण ? फक्त तीर्थक्षेत्रावरीलच नदीला आपण मानणार की आपल्या गावातल्या नदीलासुद्धा तीर्थात बदलणार?, असा महत्त्वपूर्ण सवाल कृषीमित्र सचिन बोंद्रे यांनी उपस्थित केला आहे. बोंद्रे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भाने एक व्हिडीओसह पोस्ट शेअर केली आहे. या माध्यमातून त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न चिखलीकरांना अंतर्मुख करणारा ठरत असल्याने त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

स्वत:पासून सुरुवात महत्त्वाची!

नदी म्हटले की धार्मिक स्थळ, आसपासच्या परिसराला तीर्थाचे स्वरूप प्राप्त करून देणारी जीवनवाहिनी. प्रत्येक नदीच्या काठावर अनेक दैवी ठिकाणे आपणास दिसतात. किंबहुना अनेक मोठमोठी व महत्त्वाची धार्मिकस्थळे, तीर्थक्षेत्रे ही नदीकिनारीच आहेत. इतके महत्त्व नद्यांना असताना चिखलीच्या प्रदूषणात, कचऱ्यात लुप्त होत जाणारी ‘जांबुवंती मोकळा श्वास घेऊ शकेल का’, या गोष्टीकडे आजतागायत कुणाचे लक्ष नसेल का? प्रश्न बरेच आहेत. पण सुरुवात महत्त्वाची आहे. ती आपणास करावीच लागेल, अशा शब्दात बोंद्रेंनी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार देखील घेतला आहे.