शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
2
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
3
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

जळगाव, संग्रामपूर तालुक्यांना वगळले

By admin | Updated: August 29, 2014 23:51 IST

दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून जळगाव, संग्रामपूर तालुक्यांना वगळले.

नानासाहेब कांडलकर /जळगाव जळगाव व संग्रामपूर तालुक्यात दुष्काळी स्थिती असताना दुष्काळी तालुक्यांच्या यादीत स्थान न दिल्याने येथील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. बुलडाणा जिल्हय़ात एकूण १३ तालुके आहेत. त्यापैकी पहिल्या यादीत १0 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला व परवा जाहीर झालेल्या दुसर्‍या यादीत बुलडाणा तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून समावेश करताना जळगाव जामोद व संग्रामपूर हे तालुके मात्र वगळण्यात आले. वास्तविक इतर अकरा तालुक्यांची पीक परिस्थितीची जी स्थिती आहे तीच स्थिती या दोन तालुक्यांचीसुद्धा आहे. पुरेसा पाऊस नाही, पेरणी उशिरा झाली, पिके समाधानकारक नाही, काही शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली, काहींची शेते काळीच आहे. काही पिकांना व शेतीला २२ जुलैच्या अतवृष्टीचा फटका बसला ही सर्व भयावह स्थिती असताना या दोन तालुक्यांना कोणत्या आधारावर शासनाने समृद्ध ठरविले असा सवाल शेतकरी करीत आहे. शेतकर्‍यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असंतोष पसरला असून, याचे रूपांतर काही अघटित होण्यातही होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या बाबीचा पुनर्विचार करून जळगाव व संग्रामपूर या दोन तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा आपसातील मतभेद बाजूला सारत जिल्हाधिकारी व शासन दरबारी हा विषय लावून धरला पाहिजे. येत्या दिवसात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आचारसंहितेच्या नावाखाली हा विषय बाजूला पडू शकतो. त्यामुळे नेत्यांनी आपली शक्ती पणाला लावून शासनाच्या गळी हा विषय उतरविला पाहिजे. जर हे दोन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होऊ शकले नाहीत तर शेतकरी व त्यांचे कुटुंबीयांचा प्रचंड असंतोषाला सर्व राजकीय नेत्यांना सामोरे जावे लागणार आहे.