शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जळगाव, संग्रामपूर तालुक्यांना वगळले

By admin | Updated: August 29, 2014 23:51 IST

दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून जळगाव, संग्रामपूर तालुक्यांना वगळले.

नानासाहेब कांडलकर /जळगाव जळगाव व संग्रामपूर तालुक्यात दुष्काळी स्थिती असताना दुष्काळी तालुक्यांच्या यादीत स्थान न दिल्याने येथील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. बुलडाणा जिल्हय़ात एकूण १३ तालुके आहेत. त्यापैकी पहिल्या यादीत १0 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला व परवा जाहीर झालेल्या दुसर्‍या यादीत बुलडाणा तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून समावेश करताना जळगाव जामोद व संग्रामपूर हे तालुके मात्र वगळण्यात आले. वास्तविक इतर अकरा तालुक्यांची पीक परिस्थितीची जी स्थिती आहे तीच स्थिती या दोन तालुक्यांचीसुद्धा आहे. पुरेसा पाऊस नाही, पेरणी उशिरा झाली, पिके समाधानकारक नाही, काही शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली, काहींची शेते काळीच आहे. काही पिकांना व शेतीला २२ जुलैच्या अतवृष्टीचा फटका बसला ही सर्व भयावह स्थिती असताना या दोन तालुक्यांना कोणत्या आधारावर शासनाने समृद्ध ठरविले असा सवाल शेतकरी करीत आहे. शेतकर्‍यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असंतोष पसरला असून, याचे रूपांतर काही अघटित होण्यातही होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या बाबीचा पुनर्विचार करून जळगाव व संग्रामपूर या दोन तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा आपसातील मतभेद बाजूला सारत जिल्हाधिकारी व शासन दरबारी हा विषय लावून धरला पाहिजे. येत्या दिवसात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आचारसंहितेच्या नावाखाली हा विषय बाजूला पडू शकतो. त्यामुळे नेत्यांनी आपली शक्ती पणाला लावून शासनाच्या गळी हा विषय उतरविला पाहिजे. जर हे दोन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होऊ शकले नाहीत तर शेतकरी व त्यांचे कुटुंबीयांचा प्रचंड असंतोषाला सर्व राजकीय नेत्यांना सामोरे जावे लागणार आहे.