शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव, संग्रामपूर तालुक्यांना वगळले

By admin | Updated: August 29, 2014 23:51 IST

दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून जळगाव, संग्रामपूर तालुक्यांना वगळले.

नानासाहेब कांडलकर /जळगाव जळगाव व संग्रामपूर तालुक्यात दुष्काळी स्थिती असताना दुष्काळी तालुक्यांच्या यादीत स्थान न दिल्याने येथील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. बुलडाणा जिल्हय़ात एकूण १३ तालुके आहेत. त्यापैकी पहिल्या यादीत १0 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला व परवा जाहीर झालेल्या दुसर्‍या यादीत बुलडाणा तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून समावेश करताना जळगाव जामोद व संग्रामपूर हे तालुके मात्र वगळण्यात आले. वास्तविक इतर अकरा तालुक्यांची पीक परिस्थितीची जी स्थिती आहे तीच स्थिती या दोन तालुक्यांचीसुद्धा आहे. पुरेसा पाऊस नाही, पेरणी उशिरा झाली, पिके समाधानकारक नाही, काही शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली, काहींची शेते काळीच आहे. काही पिकांना व शेतीला २२ जुलैच्या अतवृष्टीचा फटका बसला ही सर्व भयावह स्थिती असताना या दोन तालुक्यांना कोणत्या आधारावर शासनाने समृद्ध ठरविले असा सवाल शेतकरी करीत आहे. शेतकर्‍यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असंतोष पसरला असून, याचे रूपांतर काही अघटित होण्यातही होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या बाबीचा पुनर्विचार करून जळगाव व संग्रामपूर या दोन तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा आपसातील मतभेद बाजूला सारत जिल्हाधिकारी व शासन दरबारी हा विषय लावून धरला पाहिजे. येत्या दिवसात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आचारसंहितेच्या नावाखाली हा विषय बाजूला पडू शकतो. त्यामुळे नेत्यांनी आपली शक्ती पणाला लावून शासनाच्या गळी हा विषय उतरविला पाहिजे. जर हे दोन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होऊ शकले नाहीत तर शेतकरी व त्यांचे कुटुंबीयांचा प्रचंड असंतोषाला सर्व राजकीय नेत्यांना सामोरे जावे लागणार आहे.