शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवारसाठी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:16 IST

मेहकर : पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहुन जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी जैन संघटनेकडून १३४ जे.सी.बी, पोकलॅड यासह इतरही यंत्रसामुग्री देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर समिती नेमुन त्या समितीच्या माध्यमातून हा उपक्रम युध्दपातळीवर राबविण्यात येणार आहे.

मेहकर : बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृष्य परीस्थीतीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहुन जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थानीक जैन स्थानकामध्ये रविवारला नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, ३ मार्च पासून या उपक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी-अधिक होऊन अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर पिकांच्या उत्पादनावर सुध्दा याचा परीणाम जाणवत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी वाहुन जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात पडणाºया पाण्याची साठवणूक व्हावी, सर्वसामान्य जनतेसह शेतकºयांना याचा फायदा व्हावा, यासाठी भारतीय जैन संघटना पुणे यांच्यावतीने ३ मार्च पासून संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गाळउपसा, नाले, बंधारे, तलाव, धरण यांचे खोलीकरण करणे, उपसलेला गाळ शेतकºयांच्या शेतामध्ये टाकणे यासह इतरही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांच्या प्रेरणेने या उपक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जैन संघटनेकडून १३४ जे.सी.बी, पोकलॅड यासह इतरही यंत्रसामुग्री देण्यात येणार आहे. हा उपक्रम भारतीय जैन संघटनेचे सर्व समाजबांधव शासकिय अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक यांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. ३ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाची बुलडाणा जिल्ह्यात सुरवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांची उपस्थीती राहणार आहे. या उपक्रमामुळे बुलडाणा जिल्हयातील ज्या गावात पाणीटंचाई आहे. अथवा ज्या गावात बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा होतो, अशा गावातील पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे. तर यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर समिती नेमुन त्या समितीच्या माध्यमातून हा उपक्रम युध्दपातळीवर राबविण्यात येणार आहे. यावेळी बुलडाणा येथील राजेश देशलहरा, मुन्नाजी बेगाणी, गादीयाजी, अक्षय देशलहरा यांची प्रमुख उपस्थीती होती. संचालन जयचंद बाठीया यानी केले. तर आभार निलेश नाहाटा यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर