शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवारसाठी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:16 IST

मेहकर : पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहुन जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी जैन संघटनेकडून १३४ जे.सी.बी, पोकलॅड यासह इतरही यंत्रसामुग्री देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर समिती नेमुन त्या समितीच्या माध्यमातून हा उपक्रम युध्दपातळीवर राबविण्यात येणार आहे.

मेहकर : बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृष्य परीस्थीतीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहुन जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थानीक जैन स्थानकामध्ये रविवारला नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, ३ मार्च पासून या उपक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी-अधिक होऊन अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर पिकांच्या उत्पादनावर सुध्दा याचा परीणाम जाणवत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी वाहुन जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात पडणाºया पाण्याची साठवणूक व्हावी, सर्वसामान्य जनतेसह शेतकºयांना याचा फायदा व्हावा, यासाठी भारतीय जैन संघटना पुणे यांच्यावतीने ३ मार्च पासून संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गाळउपसा, नाले, बंधारे, तलाव, धरण यांचे खोलीकरण करणे, उपसलेला गाळ शेतकºयांच्या शेतामध्ये टाकणे यासह इतरही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांच्या प्रेरणेने या उपक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जैन संघटनेकडून १३४ जे.सी.बी, पोकलॅड यासह इतरही यंत्रसामुग्री देण्यात येणार आहे. हा उपक्रम भारतीय जैन संघटनेचे सर्व समाजबांधव शासकिय अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक यांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. ३ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाची बुलडाणा जिल्ह्यात सुरवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांची उपस्थीती राहणार आहे. या उपक्रमामुळे बुलडाणा जिल्हयातील ज्या गावात पाणीटंचाई आहे. अथवा ज्या गावात बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा होतो, अशा गावातील पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे. तर यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर समिती नेमुन त्या समितीच्या माध्यमातून हा उपक्रम युध्दपातळीवर राबविण्यात येणार आहे. यावेळी बुलडाणा येथील राजेश देशलहरा, मुन्नाजी बेगाणी, गादीयाजी, अक्षय देशलहरा यांची प्रमुख उपस्थीती होती. संचालन जयचंद बाठीया यानी केले. तर आभार निलेश नाहाटा यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर