शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवारसाठी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:16 IST

मेहकर : पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहुन जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी जैन संघटनेकडून १३४ जे.सी.बी, पोकलॅड यासह इतरही यंत्रसामुग्री देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर समिती नेमुन त्या समितीच्या माध्यमातून हा उपक्रम युध्दपातळीवर राबविण्यात येणार आहे.

मेहकर : बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृष्य परीस्थीतीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहुन जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थानीक जैन स्थानकामध्ये रविवारला नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, ३ मार्च पासून या उपक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी-अधिक होऊन अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर पिकांच्या उत्पादनावर सुध्दा याचा परीणाम जाणवत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी वाहुन जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात पडणाºया पाण्याची साठवणूक व्हावी, सर्वसामान्य जनतेसह शेतकºयांना याचा फायदा व्हावा, यासाठी भारतीय जैन संघटना पुणे यांच्यावतीने ३ मार्च पासून संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गाळउपसा, नाले, बंधारे, तलाव, धरण यांचे खोलीकरण करणे, उपसलेला गाळ शेतकºयांच्या शेतामध्ये टाकणे यासह इतरही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांच्या प्रेरणेने या उपक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जैन संघटनेकडून १३४ जे.सी.बी, पोकलॅड यासह इतरही यंत्रसामुग्री देण्यात येणार आहे. हा उपक्रम भारतीय जैन संघटनेचे सर्व समाजबांधव शासकिय अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक यांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. ३ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाची बुलडाणा जिल्ह्यात सुरवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांची उपस्थीती राहणार आहे. या उपक्रमामुळे बुलडाणा जिल्हयातील ज्या गावात पाणीटंचाई आहे. अथवा ज्या गावात बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा होतो, अशा गावातील पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे. तर यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर समिती नेमुन त्या समितीच्या माध्यमातून हा उपक्रम युध्दपातळीवर राबविण्यात येणार आहे. यावेळी बुलडाणा येथील राजेश देशलहरा, मुन्नाजी बेगाणी, गादीयाजी, अक्षय देशलहरा यांची प्रमुख उपस्थीती होती. संचालन जयचंद बाठीया यानी केले. तर आभार निलेश नाहाटा यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर