शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच, २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST

दरम्यान, त्याउपरही जिल्हा प्रशासन लसीचे डोस मिळताच लसीकरणास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या ही २९ लाख ...

दरम्यान, त्याउपरही जिल्हा प्रशासन लसीचे डोस मिळताच लसीकरणास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या ही २९ लाख ६४ हजार २२० च्या आसपास आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ती २५ लाखांच्या आसपास होती. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील २१ लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. ४५ ते ६० वयोगटातील १ लाख ३७ हजार ९५५ जणांना लस दिली गेली आहे. ६० वर्षांवरील १ लाख ४४ हजार ६६२ जणांना लस दिली गेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ७१ हजार २५३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यातील ८७ हजार १०१ जणांना म्हणजे एकूण पात्र लोकसंख्येच्या ४.१४ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्डचे ३ लाख ३७ हजार ६६४ तर कोव्हॅक्सिनचे ८१ हजार ५३१ डोस मिळालेले आहेत. १ लाख ७८ हजार ६५६ पुरुष, तर १ लाख ५३ हजार ३८२ महिलांनी लस घेतली आहे.

--२६ केंद्र सुरू--

जिल्ह्यात सध्या २६ केंद्रांवर लसीकरण सुरू असून, यातील दोन केंद्र खासगी आहेत. प्रारंभी जिल्ह्यात १०२ लसीकरण केंद्र होते. त्यानंतर लस पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण पाहता टप्प्याटप्प्याने केंद्र कमी झाले. आता सध्या २६ केंद्र सुरू आहेत. प्रशासनाची लस उपलब्ध झाल्यास पूर्ण लसीकरण करण्याची क्षमता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

--१८ वर्षांवरील ४९ हजार ४२९ जणांनी घेतला डोस--

१ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. पण डोस उपलब्धतेची समस्या पाहता मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर या वयोगटातील लसीकरण लांबणीवर टाकले गेले. डोसची उपलब्धता नसताना केंद्राने याबाबत घोषणा का केली, असा प्रश्नही काहीजण विचारत आहेत. १८ वर्षांखालील मुलांचा अद्याप लसीकरणासाठी विचार करण्यात आलेला नाही. त्यातच तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याने पालकवर्गही चिंतित आहे.

--१५ हजार जणांना लस देण्याची क्षमता--

आरोग्य विभागाची प्रतिदिन १५ हजार नागरिकांना लस देण्याची क्षमता आहे. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सज्जही आहे. आवश्यक सुविधा, शीतकरण यंत्रांची साखळीही उपलब्ध आहे. मात्र लसींचे डोस उपलब्ध होण्यात अडचणी आहे. लस उपलब्ध झाल्यास एक महिन्यात २ लाख ४० हजार नागरिकांचे लसीकरण गुणात्मक पद्धतीने करण्याची क्षमता आरोग्य विभागाची असल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.