शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागाशिवाय समृध्द गावाची कल्पना अशक्य- डॉ.अविनाश पोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 16:22 IST

लोकसहभागाशिवाय समृद्ध गावाची कल्पना अशक्य असल्याचे मत डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केले.

- नविन मोदे लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : पाण्याचा डॉक्टर म्हणून ज्यांची जनसामान्यांत ओळख आहे. सुमारे २० वर्षापासून ज्यांनी ग्रामस्वच्छता व जलसंधारणाच्या कार्यासाठी वाहून घेतले, असे डॉ. अविनाश पोळ. अमिर खान यांच्या पानी फाऊंडेशनचे विश्वस्त, राष्टÑपतींच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त डॉ.अविनाश पोळ हे पानी फाऊंडेशनच्या कामानिमित्त मोताळा तालुक्यामध्ये आले होते त्यावेळी त्यांचेशी संवाद साधला असता, लोकसहभागाशिवाय समृद्ध गावाची कल्पना अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मागील चार वर्षाचा पानी फाऊंडेशनचा प्रवास या टप्प्यावर त्याच्या यश-अपयशाकडे कसे बघता?समाधानी आहे. दरम्यान, लोक एकत्र आले. लोकसहभागातून प्रचंड कामे झाली. मोताळा तालुक्यातील शेतकऱ्याने आयुष्यात प्रथमच रब्बीचे पिक घेतल्याचे सांगितले. प्रत्यक्ष बांधावर जाऊन गहु बघितला हेच या संघर्षाचे मोठे फलीत आहे.

समृध्द गाव स्पर्धेचा उद्देश काय?वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो गावांनी आपआपल्या गावामध्ये पाणी साठवण्याची क्षमता वाढविली. परंतु यापैकी अनेक गावात पाण्याची उपलब्धता वाढल्याने जास्तीत जास्त पाणी लागणाºया पिकाचे क्षेत्र काढले. त्यामुळे सामुहिक जलव्यवस्थापन या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

समृध्द गाव स्पर्धेसाठी प्रामुख्याने कोणती कामे अपेक्षित आहेत?मृद व जलसंधारण, जलव्यवस्थापन, वृक्ष व जंगलाची लागवड व वाढ करणे कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य व पोत सुधारणे व स्वयंरोजगार निर्मिती यातून समृध्द गावाची निर्मिती व शाश्वत विकास होण्यास मदत होईल. यादृष्टीने वाटचाल महत्त्वाची आहे.

पाणी फाऊंडेशनच्या कामात लोकसहभाग किती महत्वाचा?लोकसहभागाच्या माध्यमातून सामुहीक लोकचळवळ निर्माण करून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास हेच पाणी फाऊंडेशनच्या कामाचे सुत्र आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग समृध्द गावासाठी महत्वाचा आहे. एखाद्या चळवळीत लोकांना सामावून घेणे, लोकांना बदलने हे निश्चितच सोपे नाही; परंतु लोक बदलतात, याचा अनुभव या मोहिमेदरम्यान चांगलाच आला. गरज असते त्यांना विश्वासात घेण्याची समाधानाची. या कार्यक्रमामध्ये युवक स्वत: पुढे येत आहे. मानसिकता बदलली की प्रश्न अनुत्तरीत राहतच नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत