शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

लोकसहभागाशिवाय समृध्द गावाची कल्पना अशक्य- डॉ.अविनाश पोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 16:22 IST

लोकसहभागाशिवाय समृद्ध गावाची कल्पना अशक्य असल्याचे मत डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केले.

- नविन मोदे लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : पाण्याचा डॉक्टर म्हणून ज्यांची जनसामान्यांत ओळख आहे. सुमारे २० वर्षापासून ज्यांनी ग्रामस्वच्छता व जलसंधारणाच्या कार्यासाठी वाहून घेतले, असे डॉ. अविनाश पोळ. अमिर खान यांच्या पानी फाऊंडेशनचे विश्वस्त, राष्टÑपतींच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त डॉ.अविनाश पोळ हे पानी फाऊंडेशनच्या कामानिमित्त मोताळा तालुक्यामध्ये आले होते त्यावेळी त्यांचेशी संवाद साधला असता, लोकसहभागाशिवाय समृद्ध गावाची कल्पना अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मागील चार वर्षाचा पानी फाऊंडेशनचा प्रवास या टप्प्यावर त्याच्या यश-अपयशाकडे कसे बघता?समाधानी आहे. दरम्यान, लोक एकत्र आले. लोकसहभागातून प्रचंड कामे झाली. मोताळा तालुक्यातील शेतकऱ्याने आयुष्यात प्रथमच रब्बीचे पिक घेतल्याचे सांगितले. प्रत्यक्ष बांधावर जाऊन गहु बघितला हेच या संघर्षाचे मोठे फलीत आहे.

समृध्द गाव स्पर्धेचा उद्देश काय?वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो गावांनी आपआपल्या गावामध्ये पाणी साठवण्याची क्षमता वाढविली. परंतु यापैकी अनेक गावात पाण्याची उपलब्धता वाढल्याने जास्तीत जास्त पाणी लागणाºया पिकाचे क्षेत्र काढले. त्यामुळे सामुहिक जलव्यवस्थापन या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

समृध्द गाव स्पर्धेसाठी प्रामुख्याने कोणती कामे अपेक्षित आहेत?मृद व जलसंधारण, जलव्यवस्थापन, वृक्ष व जंगलाची लागवड व वाढ करणे कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य व पोत सुधारणे व स्वयंरोजगार निर्मिती यातून समृध्द गावाची निर्मिती व शाश्वत विकास होण्यास मदत होईल. यादृष्टीने वाटचाल महत्त्वाची आहे.

पाणी फाऊंडेशनच्या कामात लोकसहभाग किती महत्वाचा?लोकसहभागाच्या माध्यमातून सामुहीक लोकचळवळ निर्माण करून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास हेच पाणी फाऊंडेशनच्या कामाचे सुत्र आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग समृध्द गावासाठी महत्वाचा आहे. एखाद्या चळवळीत लोकांना सामावून घेणे, लोकांना बदलने हे निश्चितच सोपे नाही; परंतु लोक बदलतात, याचा अनुभव या मोहिमेदरम्यान चांगलाच आला. गरज असते त्यांना विश्वासात घेण्याची समाधानाची. या कार्यक्रमामध्ये युवक स्वत: पुढे येत आहे. मानसिकता बदलली की प्रश्न अनुत्तरीत राहतच नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत