शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

किनगाव जट्टू परिसरात पंधरा दिवसापासून पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:39 IST

किनगाव जट्टू : परिसरात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे उभे पीक सुकण्याच्या मार्गावर आहे. लोणार तालुक्यातील किनगाव ...

किनगाव जट्टू : परिसरात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे उभे पीक सुकण्याच्या मार्गावर आहे.

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टूसह परिसरात पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने व वातावरणात उष्णता निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील उभे पीक उडीद, मूग, कपाशी, तूर, सोयाबीन इतर पिके सुकत आहेत. तर लागत असलेली फुलांची संख्या घटत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी ज्या मोजक्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात सिंचनाची व्यवस्था आहे. त्यांनी तुषार सिंचनाचा आधार घेत उभ्या पिकाला पाणी देणे सुरू केले आहे.

किनगाव जट्टूसह वसंत नगर, देवा नगर, खापरखेड या परिसरात सुरूवातीला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे आणून पेरणी केली होती. दरम्यान आद्रा नक्षत्रात अतिवृष्टी झाल्याने बऱ्याच शेतकऱ्याचे शेतात पाणी साचल्याने पिके वाहून गेल्याने दुबार पेरणी करावी लागली होती. पुन्हा बियाणे विकत घ्यावी लागली होती. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागली होती. तरीसुद्धा पाऊस कमी प्रमामात पडूनही शेतकऱ््यांनी पिके जगविली. कोळपणी, निंदण, खुरपणी इतर आंतर मशागत करून खते सुद्धा पिकाला दिली आहेत. त्यातच वातावरणाच्या बदलामुळे पिकावर किटक आळीचा प्रादुर्भाव झाल्याने महागडी औषधे आणून फवारणी करावी लागली. मूग, उडिदाला शेंगा लागत असून, सोयाबिनला फुले लागले आहेत. त्यामुळे पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली असून, वातावरणामध्ये वेळोवेळी बदल होत आहेत. परंतु किनगाव जट्टू परिसरात पाऊस पडत नसल्याने पिके सुकत असल्याचे चित्र आहे.