शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

किनगाव जट्टू परिसरात पंधरा दिवसापासून पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:39 IST

किनगाव जट्टू : परिसरात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे उभे पीक सुकण्याच्या मार्गावर आहे. लोणार तालुक्यातील किनगाव ...

किनगाव जट्टू : परिसरात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे उभे पीक सुकण्याच्या मार्गावर आहे.

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टूसह परिसरात पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने व वातावरणात उष्णता निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील उभे पीक उडीद, मूग, कपाशी, तूर, सोयाबीन इतर पिके सुकत आहेत. तर लागत असलेली फुलांची संख्या घटत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी ज्या मोजक्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात सिंचनाची व्यवस्था आहे. त्यांनी तुषार सिंचनाचा आधार घेत उभ्या पिकाला पाणी देणे सुरू केले आहे.

किनगाव जट्टूसह वसंत नगर, देवा नगर, खापरखेड या परिसरात सुरूवातीला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे आणून पेरणी केली होती. दरम्यान आद्रा नक्षत्रात अतिवृष्टी झाल्याने बऱ्याच शेतकऱ्याचे शेतात पाणी साचल्याने पिके वाहून गेल्याने दुबार पेरणी करावी लागली होती. पुन्हा बियाणे विकत घ्यावी लागली होती. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागली होती. तरीसुद्धा पाऊस कमी प्रमामात पडूनही शेतकऱ््यांनी पिके जगविली. कोळपणी, निंदण, खुरपणी इतर आंतर मशागत करून खते सुद्धा पिकाला दिली आहेत. त्यातच वातावरणाच्या बदलामुळे पिकावर किटक आळीचा प्रादुर्भाव झाल्याने महागडी औषधे आणून फवारणी करावी लागली. मूग, उडिदाला शेंगा लागत असून, सोयाबिनला फुले लागले आहेत. त्यामुळे पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली असून, वातावरणामध्ये वेळोवेळी बदल होत आहेत. परंतु किनगाव जट्टू परिसरात पाऊस पडत नसल्याने पिके सुकत असल्याचे चित्र आहे.