शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

भादोलावासीयांनी लोकवर्गणीतून उभारले ' आयसोलेशन सेंटर ' !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:34 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग बघता गावागावात आयसोलेशन सेंटर सुरु व्हावे, लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी ...

कोरोनाचा वाढता संसर्ग बघता गावागावात आयसोलेशन सेंटर सुरु व्हावे, लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले होते. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. चिखली तालुक्यातील किन्होळा ग्रामस्थांनी तुपकरांच्या आवाहनास प्रतिसाद देत लोकवर्गणीतून कोरोना आयसोलेशन सेंटर उभे केले आहे. त्या पाठोपाठ आता भादोला येथील नागरिकांनी पुढाकार घेतला असून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारलेल्या या आयसोलेशन सेंटरचे १३ मे रोजी जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे, वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश राठोड, सरपंच प्रमोदअप्पा वाघमारे, उपसरपंच अमीन खाँसाब, ग्रा.पं.सदस्य मोहन सोनुने, वसंतराव निकम, विनोद चिंचोले, शेषराव मिसाळ, मल्हारी गवई, संजय काळे, हिरालाल जैन, ग्रामसेवक अविनाश मानकर, तलाठी कुळकर्णी यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, जि.प. शाळेचे शिक्षक उपस्थित होते. दरम्यान या केंद्राची पाहणी करून जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी भादोला ग्रामस्थांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. सोबतच प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत या आयसोलेशन सेंटरला केली जाईल, अशी ग्वाही देऊन सर्व गावांनी याप्रमाणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. रविकांत तुपकर यांनी केवळ प्रशासन आणि शासकीय यंत्रणेवर विसंबून न राहता गावातील नागरिकांनी एकमेकांना आधार देण्यासाठी, मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. संचालन संदीप चव्हाण यांनी केले. यशस्वीतेसाठी शिवराजे ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.