शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

केवळ चार हजार हेक्टरवर होणार सिंचन

By admin | Updated: November 13, 2014 23:56 IST

खामगाव तालुक्यात सिचनात घट, अल्प पावसाचा खरिपासोबत रब्बीलाही फटका.

खामगाव (बुलडाणा) : यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे तालुक्यातील धरणे तुडूंब भरली नसल्याने जलसाठा खालावला आहे. पाटाच्या पाण्यावर रब्बी हंगाम होणार असून खामगाव तालुक्यात केवळ चार हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन सिमीत राहणार आहे. खरीपासोबत रब्बीलाही अल्प पावसाचा फटका बसणार आहे. गेल्या ४ ते ५ वर्षापासून पावसाळा कमी जास्त होत असल्याने तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र कमालीचे घटत आहे. गतवर्षी १00 टक्के पावसाळा असल्याने तालुक्यातील धरणाने ८ हजार हेक्टर क्षेत्रापेक्षाही रब्बी तसेच उन्हाळी पिकांना पाणी पुरविले. रब्बीचा गहू व हरभरा तर उन्हाळी भुईमुंग तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पिकला. मात्र यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने शेतकर्‍यांचा खरीप हंगाम प्रथमच हातचा निघून गेला. पेरणीसाठी केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकरी पार खचला आहे. खरीपात झालेली हानी भरून काढण्याची संधी रब्बी हंगामात मिळते. मात्र यावर्षी दमदार पावसाअभावी या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. खामगाव तालुक्यात मन, तोरणा, मस, ज्ञानगंगा व ढोरपगाव या धरणातील पाण्यावर सिंचन केले जाते. मन प्रकल्प हा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून याची जलाशय क्षमता ३८.८३ दलघमी आहे. तर ज्ञानगंगा ३३.९३, तोरणा ७.९0, ढोरपगाव ५.८३, व मस १५.0४ दलघमी आहे. या अपुरा पावसाळा झाल्याने सद्यास्थितीत मनमध्ये ५३ टक्के, तोरणा २0 टक्के, ढोरपगाव ७८ टक्के, ज्ञानगंगा ७0 टक्के तर मसमध्ये सर्वात जास्त म्हणजे ९१ टक्के जलसाठा आहे. धरणामध्ये जलसाठा कमी असल्याने सिंचनाचे नियोजनबध्द सिमीत होणार आहे. ३ हजार ४00 हेक्टर क्षेत्रापर्यंंत रब्बीसाठी पाणी देण्यात येणार आहे.