शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

विद्युत रोहित्र जळण्याच्या घटनांमुळे सिंचनाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:45 IST

Buldhana News पाण्याची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याचे चित्र आहे. 

 लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या एक ते दीड महिन्यापासून वीज रोहित्र जळण्याच्या प्रकारामुळे रब्बी हंगामातील सिंचनाला फटका बसत असून,  गेल्या महिन्यात जिल्ह्यातील तब्बल ७० वीज रोहित्र जळाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्ह्यात वीज रोहित्रासाठी आवश्यक असलेेले ऑईलही उपलब्ध होण्यात अडचणी आल्याने ही समस्या गंभीर बनली होती. प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले होते. सोबतच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना २३ नोव्हेंबर रोजी ऑईल उपलब्ध करण्यासाठी एक निवेदन दिले होते. त्याच्या परिणामस्वरुप सध्या जिल्ह्याला १२ हजार लिटर ऑईल उपलब्ध झाले असून या आंदोलनाचा परिणाम म्हणून वीज रोहित्र दुरुस्तीचे प्रमाणही महावितरणकडून आता वाढविण्यात आले आहे. वीज रोहित्र दुरुस्तीची प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी साधारणत: आठवड्याचा कालावधी लागत आहे. पूर्वी हाच कालावधी जवळपास एक महिन्याचा होता. मात्र आता त्यात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. गहू, हरभरा पिकांना वीज रोहित्र जळण्याच्या घटनांमुळे जिल्ह्यात मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. तक्रार करूनही प्रतीक्षेतच जिल्ह्यात दीड लाख कृषीपंपधारक शेतकरी असून १४, ५०० वीज रोहित्रावरून त्यास वीजपुरवठा होतो. दरवर्षी साधारणत: १,५०० वीज रोहित्र जळतात असा अंदाज आहे. त्यामुळे तक्रार करूनही वीज रोहित्र दुरुस्तीसाठी मोठा कालावधी लागत असल्याचे चित्र आहे. 

४० हजार लिटर ऑईलची गरज जिल्ह्यासाठी ४० हजार लिटर ऑईलची गरज असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर १२ हजार लिटर ऑईल जिल्ह्यास प्राप्त झाले असून टप्प्याटप्प्याने ते मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वीज रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढल्याने पाणी उपलब्ध असूनही शेतीला पाणी देता येत नाही. यंदा पाण्याची उपलब्धता असतानाही ही अडचण आहे. वीज रोहित्र वेळेत दुरुस्त करून मिळाल्यास सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करणे शक्य होईल.          

 - प्रशांत कानडजे,  शेतकरी

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती