शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत रोहित्र जळण्याच्या घटनांमुळे सिंचनाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:45 IST

Buldhana News पाण्याची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याचे चित्र आहे. 

 लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या एक ते दीड महिन्यापासून वीज रोहित्र जळण्याच्या प्रकारामुळे रब्बी हंगामातील सिंचनाला फटका बसत असून,  गेल्या महिन्यात जिल्ह्यातील तब्बल ७० वीज रोहित्र जळाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्ह्यात वीज रोहित्रासाठी आवश्यक असलेेले ऑईलही उपलब्ध होण्यात अडचणी आल्याने ही समस्या गंभीर बनली होती. प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले होते. सोबतच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना २३ नोव्हेंबर रोजी ऑईल उपलब्ध करण्यासाठी एक निवेदन दिले होते. त्याच्या परिणामस्वरुप सध्या जिल्ह्याला १२ हजार लिटर ऑईल उपलब्ध झाले असून या आंदोलनाचा परिणाम म्हणून वीज रोहित्र दुरुस्तीचे प्रमाणही महावितरणकडून आता वाढविण्यात आले आहे. वीज रोहित्र दुरुस्तीची प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी साधारणत: आठवड्याचा कालावधी लागत आहे. पूर्वी हाच कालावधी जवळपास एक महिन्याचा होता. मात्र आता त्यात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. गहू, हरभरा पिकांना वीज रोहित्र जळण्याच्या घटनांमुळे जिल्ह्यात मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. तक्रार करूनही प्रतीक्षेतच जिल्ह्यात दीड लाख कृषीपंपधारक शेतकरी असून १४, ५०० वीज रोहित्रावरून त्यास वीजपुरवठा होतो. दरवर्षी साधारणत: १,५०० वीज रोहित्र जळतात असा अंदाज आहे. त्यामुळे तक्रार करूनही वीज रोहित्र दुरुस्तीसाठी मोठा कालावधी लागत असल्याचे चित्र आहे. 

४० हजार लिटर ऑईलची गरज जिल्ह्यासाठी ४० हजार लिटर ऑईलची गरज असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर १२ हजार लिटर ऑईल जिल्ह्यास प्राप्त झाले असून टप्प्याटप्प्याने ते मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वीज रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढल्याने पाणी उपलब्ध असूनही शेतीला पाणी देता येत नाही. यंदा पाण्याची उपलब्धता असतानाही ही अडचण आहे. वीज रोहित्र वेळेत दुरुस्त करून मिळाल्यास सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करणे शक्य होईल.          

 - प्रशांत कानडजे,  शेतकरी

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती