शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

जिल्ह्याचा सिंचन अनुशेष १०,२२५ कोटींच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:36 IST

१३ हजार ८७४ कोटी रुपये किंमत असलेल्या जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर आतापर्यंत ४ हजार ९९ कोटी (मार्च २०२० पर्यंत) ...

१३ हजार ८७४ कोटी रुपये किंमत असलेल्या जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर आतापर्यंत ४ हजार ९९ कोटी (मार्च २०२० पर्यंत) खर्च करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी आणखी नऊ हजार ७७५ कोटी ५९ लाख रुपयांची गरज आहे. त्यानुषंगाने आगामी पाच वर्षांत सरासरी जिल्ह्यातील निर्माणाधीन व पूर्णत्वास गेलेल्या तथा काही किरकोळ कामे राहिलेल्या प्रकल्पांसाठी सरासरी दोन हजार रुपये उपलब्ध झाल्यास हा सिंचन अनुशेष दूर होण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त बोरखेडी, राहेरी या लघु प्रकल्पासाठी अनुक्रमे २२.७ कोटी आणि ४ कोटी ६५ लाख रुपयांची गरज आहे. या व्यतिरिक्त बळिराजा संजीवनी योजनेंतर्गत आलेवाडी प्रकल्पासाठी १२० कोटी २९ लाख, अरकचेरी प्रकल्पासाठी २२२ कोटी ८० लाख रुपये आणि चौंढी प्रकल्पासाठी ७८ कोटी ५३ लाख रुपयांची आवश्यकता आहे. आगामी तीन वर्षांमध्ये हा निधी अपेक्षेप्रमाणे उपलब्ध झाल्यास जिल्ह्याचा १० हजार २२५ कोटी ७९ लाख रुपयांचा सिंचन अनुशेष दूर होऊ शकतो. मात्र, त्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने निधी वाटपाच्या सूत्राच्या बाहेर जाऊन मदत करणे गरजेचे झाले आहे.

--जिल्ह्यातील १०८ प्रकल्प पुर्ण--

जिल्ह्यातील दोन मोठे, सात मध्यम आणि ९९ लघु प्रकल्प पूर्णत्वास गेले असून, बांधकामाधीन प्रकल्पांमध्ये दोन मोठ्या आणि पाच लघु प्रकल्पांचा समावेश आहे. अपेक्षित निधी नियमित स्वरूपात दरवर्षी उपलब्ध झाला तर येत्या पाच वर्षांत सिंचन अनुशेष दूर केला जाऊ शकतो. मात्र, त्यासाठी आता राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

--६८ हजार हेक्टर प्रत्यक्ष सिंचन--

जिल्ह्यातील १०८ पूर्ण झालेल्या प्रकल्पांची निर्मित सिंचन क्षमता ही एक लाख १५६३ हेक्टर असून, त्यापैकी प्रत्यक्षात ६९ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळत आहे. त्याचे क्षेत्र हे ६९ हजार ७०४ हेक्टर एवढे येते. दरम्यान, जिल्ह्यातील महत्तम सिंचन क्षमता ही दोन लाख २३ हजार हेक्टरच्या आसपास आहे. निर्माणाधीन प्रकल्प पूर्ण झाल्यास जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेत आणखी वाढ होऊन जवळपास ९१ हजार ४७१ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल.