शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यातील अविभाज्य घटक म्हणजे आनंद

By admin | Updated: March 14, 2016 01:44 IST

प्रसाद कुलकर्णी यांनी शिकविली जगण्याची कला

बुलडाणा : जीवन म्हणजे परमेश्‍वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. जीवनात मार्गक्रमण करीत असताना सकारात्मकतेची कास धरा आणि या देणगीचे सोने करा, मानवी जीवनातील अविभाज्य घटना म्हणजे आनंद आहे. त्यामुळे दु:ख आणि निराश भावनांचा कोपरा दाखवत नेहमी आनंदी राहा, अशा मौलिक सल्ल्याचे वाण प्रसाद कुलकर्णी यांनी दिले. राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाच्या आज दुसर्‍या दिवशी आयोजित ह्यआनंदयात्राह्ण या बहुढंगी एकपात्री कार्यक्रमातून त्यांनी उपस्थिताना जीवन जगण्याची कला शिकविली.विनोदी किस्से, हकीकती, काव्य, अनुभवांची सुंदर गुंफण करीत कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम तितक्याच सफाईदारपणे सादर केला. हास्याच्या खळखळाटासह विविध विषयांवर त्यांनी हाउसफुल्ल भरलेल्या गर्दे वाचनालय सभागृहातील उपस्थित प्रत्येक श्रोत्यांना अंतर्मुखही केले. दुपारी ३ वाजता ह्यआनंदयात्राह्ण ला प्रारंभ झाला आणि त्यानंतर दीड तासांहून अधिक काळ रंगलेली ही यात्रा कधी संपली, याचे भानही उरले नाही. उपस्थितांशी सुसंवाद साधत कुलकर्णी यांनी ह्यआनंदयात्राह्ण उत्तरोत्तर खुलवत नेली. ते म्हणाले, ह्यआपले जीवन म्हणजे परमेश्‍वराने दिलेला कोरा धनादेश आहे. सकाळ झाली की, हा धनादेश तो मानवाच्या हाती देतो. त्याचा उपयोग कसा करायचा, हे ज्याने त्याने पाहायचे असते, ठरवायचे असते. प्रत्येक जण ह्यनिगेटिव्ह माइंडह्ण ने वाटचाल करीत आहे. जीवन ही सुंदर देणगी आहे, याचा विसर पडत चालला आहे. सुख-दु:ख, वादविवाद, हेवेदावे, संघर्ष आदी तर प्रत्येकाच्या वाट्याला येतातच; पण त्यातही सकारात्मकतेचा विचार केल्यास जीवन सुंदर बनण्यास वेळ लागणार नाही. प्रख्यात तबलावादक उस्ताद जाकिर हुसेन यांचे तबलावादन ऐकण्यात तल्लीन झालो असता, उद्या डब्यात भाजी काय करायची? असा बायकोने विचारला प्रश्न आणि व्यक्तीच्या प्रवृतीनुसार त्यांना होणारे आजार, या विविध गमतीदार उदाहरण देताना कुलकर्णी यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकविला. नातेसंबंध, नातीगोती किती महत्त्वाची असतात, कुठल्या वळणावर ती निर्माण होतात, पुढे ती जपली जातात की तडा जातो, आदी बाबी त्यांनी विविध हकीकतींच्या माध्यमातून मांडल्या. ह्यप्रेम घेता आले पाहिजे, प्रेम देता आले पाहिजेह्ण, असा मौलिक सल्लाही दिला. यावेळी प्रमुख अतिथी चित्रपट कलावंत विनोद वनवे, डॉ.देपक लद्दड उपस्थित होते. संचालन रणजित राजपूत व आभार प्रा.विलास सपकाळ यांनी मानले.