शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आठ फळ पिकांना विमा संरक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:23 IST

बुलडाणा : सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये  पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना जाहीर  करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी,  केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब व लिंबू या आठ फळ िपकांकरिता राबविण्यात येणार असून, योजनेंतर्गत फळ  पीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे,  तसेच गारपीट नुकसानाकरिता स्वतंत्र विम्याची मदत शेतकर्‍यांना  मिळणार आहे. 

ठळक मुद्देआंबिया बहार विमा योजना गारपीट नुकसानकरिता मिळणार स्वतंत्र विम्याची मदतफळ पिकांना विम्याचे कवच

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये  पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना जाहीर  करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी,  केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब व लिंबू या आठ फळ िपकांकरिता राबविण्यात येणार असून, योजनेंतर्गत फळ  पीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे,  तसेच गारपीट नुकसानाकरिता स्वतंत्र विम्याची मदत शेतकर्‍यांना  मिळणार आहे. आंबिया बहार व गारपीटमध्ये पुनर्रचित  हवामान आधारित फळ  पीक विमा योजना कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे.  गारपीटमध्ये ही योजना कर्जदार शेतकर्‍यांना सक्तीची असून,  बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छीक आहे. योजना चार  समूहांमध्ये राबविण्यात येणार आहे. समूह एक मध्ये इफको  टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, समूह दोन व  तीनमध्ये एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व समूह  चारमध्ये बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत  राबविण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना विमा हप्ता दर संरक्षित  रकमेच्या पाच टक्के किंवा वास्तवदश्री दर यापैकी जी कमी  असेल ती रक्कम शेतकर्‍यांनी भरावयाची आहे. उर्वरित विमा  हप्ता केंद्र व राज्य शासन समप्रमाणात अदा करणार आहे. फळ  पीक विमा योजनेत काही तालुके व महसूल मंडळ समाविष्ट  करण्यात आले आहेत. त्यामध्ये द्राक्ष या फळ पिकासाठी   बुलडाणा तालुक्यातून मंडळ बुलडाणा, मोताळा तालुक्यातून  बोराखेडी, जळगाव जामोद तालुक्यातून जळगाव जामोद,  संग्रामपूर तालुक्यातून बावनबीर व सोनाळा या मंडळांचा  समावेश आहे. मोसंबी या फळ पिकासाठी सिंदखेड राजा,  सोनोशी, किनगाव राजा, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदूर्जन,  साखरखेर्डा या मंडळांचा समावेश आहे. डाळिंब फळ पिकासाठी चिखली, पेठ, चांधई, हातणी, धोडप,  अमडापूर, एकलारा, उंद्री, कोलारा, शेलगाव अटोळ, मेरा खु.,  बुलडाणा, धाड, शेलापूर, बोराखेडी, मोताळा व धामणगाव  बढे, पिंपळगाव काळे  या मंडळांचा  समावेश आहे. पेरू या  फळ पिकासाठी साखळी बु., चिखली, हातणी व चांदई, मेहकर  तालुक्यातून डोणगाव, हिवरा आश्रम, शेलगाव देशमुख  या  मंडळांचा  समावेश आहे.  केळी या फळ पिकासाठी बुलडाणा,  बोराखेडी, मोताळा, पिंप्री गवळी, पिंपळगाव देवी, धामणगाव  बढे, रोहिणखेड, जळगाव जामोद,  बावनबीर, सोनाळा, संग्राम पूर, मेरा खु.,  हिवरखेड, काळेगाव, वझर, लाखनवाडा, पिं पळगाव राजा, डोणगाव, हिवरा आश्रम, वरवंड, जानेफळ,  नायगाव द. या मंडळांचा  समावेश आहे.  संत्रा या फळ  िपकासाठी डोणगाव, हिवरा आश्रम, जानेफळ, नायगाव द.,  मेहकर, शेलगाव देशमुख, बिबी, अंजनी खुर्द, सुलतानपूर,  लोणार, हिरडव, आडगाव, लाखनवाडा, हिवरखेड, काळेगाव,  वझर,  बावनबीर व सोनाळा, शेंदूर्जन, साखरखेर्डा, मलकापूर  पांग्रा, अंढेरा व दे.मही, जळगाव जामोद- जामोद या मंडळांचा   समावेश आहे.  आंबा या फळ पिकासाठी सिंदखेड राजा या मंडळांचा  समावेश  आहे. या योजनेनुसार कमी-जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सा पेक्ष आद्र्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या  कालावधीत शेतकर्‍यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य  देण्यात येणार आहे.  शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता  जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभागी व्हावे, असे  आवाहन कृषी विभागाने केले  आहे.   

अशा आहे प्रस्ताव सादर करण्याच्या मुदतीआंबिया बहारातील मोसंबी, केळी, पेरू, डाळिंब या पाच फळ  िपकांसाठी शेतकर्‍यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे ३१ ऑक्टोबर  २0१७ पर्यंत सादर करावयाचे आहे. तसेच द्राक्ष फळ पिकाकरि ता १५ ऑक्टोबर, लिंबुकरिता १४ नोव्हेंबर, आंबा फळ  िपकासाठी ३१ डिसेंबर तर संत्रा व काजू फळ पिकाकरिता ३0  नोव्हेंबर २0१७ पर्यंत प्रस्ताव बँकांना सादर करावयाचे आहेत.