शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

साखरखेर्डा : कोरोना विषाणू संक्रमणानंतर २७ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. त्याअनुषंगाने साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची ...

साखरखेर्डा : कोरोना विषाणू संक्रमणानंतर २७ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. त्याअनुषंगाने साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. या सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमधील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिल्यानंतर प्रत्येक शिक्षकांची कोरोना टेस्ट सुरू आहे . साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. टेस्ट करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांची तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे यांनी दिली . महाराष्ट्र शासनाने दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू केले होते. वर्ग सुरू करताना पालकांची सहमती आवश्यक ठेवण्यात आली होती. त्यावेळी प्रथम दोन टप्प्यांत वर्ग भरविण्यात आले होते. परंतु सुरुवातीला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तालुक्यातील शाळांमध्ये केवळ १० टक्के उपस्थिती होती. त्यानंतर मात्र उपस्थिती वाढली.

चौकट...

कोरोना उपाययोजनांवर भर!

- सोशल डिस्टनचे अंतर राखून आणि तोंडाला रूमाल किंवा मास्क लावून विद्यार्थी आले. शाळांमध्ये सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. दररोज तपासणी करण्यात आली. साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर-पांग्रा येथील शाळेत एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. शिक्षक आणि संस्थाचालक यांनी घेतलेली खबरदारी उपयोगी आली. तोच धागा धरून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

चौकट..

२२ गावांतील २५० शिक्षकांची टेस्ट

तालुक्यातील प्रथम पाचवी ते आठवीपर्यंत शिकवीणीचे कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद, उच्च प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमधील साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत असलेल्या साखरखेर्डा, सवडद, मोहाडी, राताळी, तांदूळवाडी, दरेगाव, शेंदुर्जन, शिंदी, पिंपळगा- सोनारा, सावंगी भगत, गुंज, वरोडी, राजेगाव, सायाळा, लिंगा, जागदरी, जनुना तांडा, बाळसमुद्र, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, राताळी या २२ गावांतील २५० शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. या स्पेसमध्ये सर्व शिक्षक निगेटिव्ह आले आहेत.

कोट...

सर्व शिक्षक निगेटिव्ह आले असले तरी, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविताना खबरदारी म्हणून तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून शाळेत पाठवावे. कोरोना संसर्गजन्य आजार कमी झाला असला, तरी भीती कायम आहे.

डॉ. संदीप सुरुशे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरखेर्डा

-------