शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

पिकांवर पावसानंतर आता किडीचे संकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST

बुलडाणा: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून पावसाच्या हजेरीने पिकांना संजीवनी मिळाली आहे. ...

बुलडाणा: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून पावसाच्या हजेरीने पिकांना संजीवनी मिळाली आहे. परंतु काही भागांत रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोयाबीनवरही ‘गर्डल बिटल’चा प्रादुर्भाव झाला असून, सोयाबीनच्या झाडाचे शेंडेच गायब होत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात मृग नक्षत्रात झालेल्या चांगल्या पावसावर जवळपास ६० टक्के पेरणी पूर्ण झाली होती. आता ६४ टक्के पेरणी झालेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पीक आहे. सध्या वातावरणातील बदलाने पिकांना कडीचा फटका बसत आहे. सोयाबीन पिकांमध्ये खोड पोखरणाऱ्या किडींमध्ये प्रामुख्याने खोडमाशी आणि चक्रभुंगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. इतर किडींच्या तुलनेत या दोन किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चक्र भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत, तर खोडमाशी मुळे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे या किडींचे वेळीच योग्य नियोजन करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या औषधांची फवारणी करत आहेत. सोयाबीन शिवाय मूग, उडीद, चवळी, तूर, भुईमूग, मिरची, कारली या पिकावरही ‘गर्डल बिटल’चा प्रादुर्भाव होत आहे. या किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

फवारणी करूनही जाईना कीड

चक्रभुंगा किडीचा प्रादुर्भाव हा सोयाबीनचे पीक साधारपणे २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर सुरू होताे. सध्या या किडीने सोयाबीनवर हल्ला केला आहे. ही अळी पानाच्या देठात अंड देते. तसेच ही कीड खोडात राहते. त्यामुळे फवारणी केल्यानंतरही या किडीचा प्रादुर्भाव लवकर जात नाही. त्यामुळे काही शेतकरी अनेकवेळा फवारणी करतात.

प्रादुर्भावाची लक्षणे...

झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेले दिसते. पान फक्त सुकलेले असेल, तर चक्रभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते, तर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असते तर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी दिलेल्या अंड्यातून लवकरच अळी निघण्याची स्थिती असेल. अंड्यातून ३ ते ४ दिवसांनी अळी बाहेर पडते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेचा वरील भाग सुकून नंतर वाळतो. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात व त्या पूर्ण भरत नाहीत.

या दिवसात खोडमाशी, खोडकीड, ‘गर्डल बिटल’चा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर जाणवतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. थायामेथोक्झाम आणि लॅम्बडा सायहॅलोथ्रिन एकत्र चार मिली १० लिटर पाण्यात एका पंपाला देणे आवश्यक आहे.

डॉ. सी. पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ

जिल्ह्यातील पेरणीची स्थिती (हेक्टरमध्ये)

एकूण नियोजन ७३४१७७

झालेली पेरणी ४६७१२४

सोयाबीन नियोजन ४०९२११

पेरणी २६६७०९

कपाशी १६८८६९

पेरणी १२६९२७

मूग १९२७५

पेरणी ९४४५

तूर ७६७१८

पेरणी ४३२१८

मका २०२३६

पेरणी ८९३७