शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

इन्कलाब जिंदाबाद... वंदे मातरम्...।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:16 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कारकीर्दीवर महानायक या कादंबरीसह ‘पानिपत’, ‘संभाजी’ यासारख्या १५ कादंबऱ्या लिहिणारे, अनेक पुरस्कारप्राप्त आणि मानाच्या साहित्य ...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कारकीर्दीवर महानायक या कादंबरीसह ‘पानिपत’, ‘संभाजी’ यासारख्या १५ कादंबऱ्या लिहिणारे, अनेक पुरस्कारप्राप्त आणि मानाच्या साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी ठरलेले विश्वास पाटील यांनी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, स्वागताध्यक्ष बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, ‘बारोमास’कार प्रा. सदानंद देशमुख, जयश्री शेळके, विजय अंभोरे, जयसिंगराजे देशमुख, सुरेश साबळे उपस्थित होते. उद्घाटन समारंभात दीपप्रज्वलन केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, दिवंगत भगवान ठग व ताराबाई शिंदे यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी स्वागतसत्रही पार पडले. विश्वास पाटील यांनी नेताजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. जपानच्या त्या सैनिकांना आठवणीबद्दल विचारले असताना नेताजींनी सोन्याचा कुंभ उगवला, त्याची किरणे आम्ही मनात साठवली आहेत, असे त्यांनी सांगितले. जपानमध्ये फिरताना पुरुष येथे आहेत की नाही असे वाटते, एवढ्या प्रचंड प्रमाणात महिला अग्रभागी आहेत. नेताजी तेथे असताना एकही महिला घराबाहेर पडत नव्हती. महिलांना प्रोत्साहित करून त्यांनी एवढे परिवर्तन घडवून आणले की, आज महिलाच कारभारी आहेत. सिंगापूरमध्येही त्यांनी क्रांती घडविली. महिलांच्या हाती बंदूक देणारे नेताजी पहिले, क्रांतिकारी आहेत. नेताजींचे क्रांतिकारी विचार आजच्या युवकांनी आत्मसात केले पाहिजे. प्रास्ताविकात मुख्य संयोजक सतीशचंद्र रोठे यांनी संमेलनामागील भूमिका विशद केली. सुभाषबाबू हे देशाचे आयडॉल आहेत. मात्र, ते जनमनावर रुजवले, बिंबवले गेले नाहीत. आपल्या देशात सहकार्य मिळाले नाही, म्हणूनच त्यांनी विदेशात आपली फौज उभारली. त्यात महिलांना स्थान दिले. झाशी राणी ब्रिगेड स्थापन करून लक्ष्मी सहगल यांना प्रमुख बनवले. यावेळी अनघा भनजी मंडळाने स्वागतगीत व शिवरायांच्या पराक्रमाचा पोवाडा सादर केला. संचालन रणजितसिंह राजपूत यांनी केले.

साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या मनाचा कानोसा घ्यावा : पाटील

साहित्य संमेलनानिमित्त साहित्यिक, लेखकांनी जीवन टिपावे, वाचकांच्या हृदयाचा ठाव घ्यावा. शेतकऱ्यांच्या मनाचा कानोसा घ्यावा म्हणजेच अस्सल, कसदार लिखाण करता येईल, अशी अपेक्षा कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.