शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अन्याय खपवून घेतला जाणार नाही

By admin | Updated: August 26, 2014 22:21 IST

समतेचे निळे वादळ संघटना: भाई अशांत वानखडे यांचा इशारा

मलकापूर : राज्यभरातील दलितांवरील अत्याचार, रमाई घरकुल योजनेतील भेदभाव, सर्व जाती धर्मातील गरिबांना दारिद्रय़ रेषेखालील कार्ड असो किंवा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा दलित व जनसामान्यांशी निगडित प्रश्नांना हात घालण्याचे काम २२ ऑगस्ट रोजी समतेचे निळे वादळ या नव्यानेच स्थापित संघटनेने केले. भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वात यावेळी पीडित व शोषितांनी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढला. जाफ्राबाद तालुक्यातील वरूड येथे भन्ते संबोधीसह ४६ जणांवर दाखल करण्यात आलेला कलम ३0७ चा खटला मागे घेऊन त्यांची हसरूल तुरूंगातून तत्काळ मुक्तता करा, पश्‍चिम विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करा, भारतीय संविधानातील समतेच्या कलमांचा आदर राखून रमाई आवास योजना शहराप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा २ लाख रूपयांत करण्यात यावी, यासोबतच या योजनेसाठी दारिद्रय़ रेषेची असलेली अट रद्द करून वंचिताना लाभ द्यावा, भूमिहीन शेतमजुरांना अतिक्रमित शेतजमिनीचे कायम पट्टे देण्यात यावे, सर्व जाती-धर्माच्या गरिबांना दारिद्रय़ रेषेचे कार्ड देण्यात यावे, सर्व राहत्या झोपड्यांना स्लम घोषित करून ते अतिक्रमण कायम करण्यात यावे, स्वाभिमानी स्वावलंबन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, राजमाता जिजाऊ जन्मस्थळास राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा, बौद्धांना बौद्ध म्हणून दाखले द्या, बुलडाण्याच्या जयस्तंभ चौकात नियोजित पुतळे उभारा, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना भाई अशांत वानखेडे यांनी पोलिस यंत्रणेवर टिकेची झोड उठवत मांडलेले प्रश्न हे दीनदलित व गरिबांचा कैवार घेणारे होते. दबावापोटी पोलिस करत असलेल्या कारवाया दलित समाज सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. समतेचं निळं वादळ ही संघटना समाजाच्या प्रश्नावर लढणारी संघटना असून, कुणाच्याही दबावाखाली ही संघटना काम करत नाही, हे ठामपणे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयावर जमलेला विराट जनसमुदाय हा या मोर्चाच्या प्रश्नांशी निगडित होता. त्यामुळे या प्रश्नांची जाण प्रशासनाला झाली नाही तर येणार्‍या काळात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. या मोर्चात जिल्हाभरातील नागरिक उत्स्फरूतपणे सहभागी झाले होते.