शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

साथरोग प्रतिबंधासाठी जलस्रोताच्या शुद्धीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST

जिल्ह्यामध्ये हे सर्वेक्षण तालुका आरोग्य अधिकारी अधीनस्त कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी व पंचायत विभागाअंतर्गत ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक यांच्या माध्यमातून केले ...

जिल्ह्यामध्ये हे सर्वेक्षण तालुका आरोग्य अधिकारी अधीनस्त कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी व पंचायत विभागाअंतर्गत ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक यांच्या माध्यमातून केले जाते. स्वच्छता सर्वेक्षणामध्ये दरवर्षी शासन निर्णयाप्रमाणे सर्वेक्षण न केल्यास त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुरुस्ती तसेच कार्डमध्ये दिलेल्या त्रुटीची पूर्तता करणे अपेक्षित असताना लक्ष दिले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा होऊन साथ रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे हे सर्वेक्षण योग्य पद्धतीने आणि गांभीर्याने राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या आहेत.

साथरोगाचा उद्रेक टाळण्यासाठी उपाययोजना

प्रत्येक ग्रामपंचायतीने तीन महिने पुरेल इतका ब्लिचिंग पावडरचा साठा उपलब्ध ठेवणे, गट ग्रामपंचायत असल्यास संबंधित ग्रामपंचायतीने वाडी - वस्तीवरसुद्धा ब्लिचिंग पावडर साठा उपलब्ध ठेवणे, नवीन बॅग असल्यास त्वरित नमुना प्रयोगशाळेत तपासणी करता पाठवणे, ग्रामपंचायत व वाडी वस्तीवरील सर्व पिण्याच्या पाण्याचे सर्व नमुने जैविक तपासणीकरिता पाठविणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे.