शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

सर्व शेती कर्जांची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:52 IST

बुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें तर्गत कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जांची  माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांनी विविध  बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खा त्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये  जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न  भरल्यास अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे.

ठळक मुद्देकर्जमाफी अर्जामध्ये शेतकर्‍यांनी सर्व बँकांकडील कर्जाची  माहिती देणे अनिवार्यजिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद करणे आवश्यक 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें तर्गत कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जांची  माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांनी विविध  बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खा त्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये  जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न  भरल्यास अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे. सर्व बँकांच्या कर्जाची नोंद करण्याकरिता शेतकर्‍यांना  नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून, त्याच अर्जामध्ये एडीट  ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी लागणार आहे. अर्ज सादर  करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक व ग्रामीण बँक अशा  सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या सर्व प्रकारच्या  कर्जाची माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी  लागणार आहे. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली  नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार  कारवाई करण्यात येणार आहे. अर्ज सादर करताना सर्व  बँकांकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे  अनिवार्य आहे. सदर माहिती सादर न केल्यास व अर्जदाराचा  अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र राहिल्यास त्याला अर्जदार  जबाबदार राहणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी अशी माहिती  सादर केली नाही, त्यांनी ती त्वरित ऑनलाइन एडीट ऑ प्शनमधून सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक  नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद करणे आवश्यक शेतकर्‍यांनी दोन ते तीन बँकांकडून कर्ज घेतले आहे.  कर्जमाफीच्या अर्जात ज्या बँकेचे कर्ज जास्त आहे, त्याची  नोंद केली आहे; मात्र शेतकर्‍यांनी दिलेले अर्ज सर्व बँकेकडे  जाणार असून, एखाद्या बँकेतील कर्जाची नोंद नसली तर  अर्ज रद्द करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेव्य ितरिक्त इतर बँकांकडून कर्ज घेतले असले, तरी त्यांना १.५0  लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास् तीत जास्त कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी जिल्हा बँक  आणि इतर बँकेकडे आधार कार्ड, के.वाय.सी.कागदपत्रे  द्यावीत, शेतकर्‍यांनी एकापेक्षा जास्त बँकांकडून कर्ज घे तलेली असतील व एकाच बँकेच्या कर्जाचा ऑनलाइन  अर्जामध्ये उल्लेख केला असेल, अशा शेतकर्‍यांनी त्यांच्या  अर्जामध्ये दुरुस्ती करून जिल्हा बँकेसह सर्वच बँकांच्या  कर्जाची व बचत खात्याची माहिती सुविधा केंद्रावर जाऊन  ऑनलाइन अर्जामध्ये अपडेट करुन घेणे आवश्यक आहे. 

आधार कार्ड बँकेत देणे आवश्यक  शेतकर्‍यांनी बँकेमध्ये कर्जखात्याला आधार कार्ड लिंक  करणे आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक केले नाही तर  वंचित राहावे लागणार आहे. -