शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सर्व शेती कर्जांची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:52 IST

बुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें तर्गत कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जांची  माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांनी विविध  बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खा त्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये  जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न  भरल्यास अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे.

ठळक मुद्देकर्जमाफी अर्जामध्ये शेतकर्‍यांनी सर्व बँकांकडील कर्जाची  माहिती देणे अनिवार्यजिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद करणे आवश्यक 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें तर्गत कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जांची  माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांनी विविध  बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खा त्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये  जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न  भरल्यास अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे. सर्व बँकांच्या कर्जाची नोंद करण्याकरिता शेतकर्‍यांना  नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून, त्याच अर्जामध्ये एडीट  ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी लागणार आहे. अर्ज सादर  करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक व ग्रामीण बँक अशा  सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या सर्व प्रकारच्या  कर्जाची माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी  लागणार आहे. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली  नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार  कारवाई करण्यात येणार आहे. अर्ज सादर करताना सर्व  बँकांकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे  अनिवार्य आहे. सदर माहिती सादर न केल्यास व अर्जदाराचा  अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र राहिल्यास त्याला अर्जदार  जबाबदार राहणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी अशी माहिती  सादर केली नाही, त्यांनी ती त्वरित ऑनलाइन एडीट ऑ प्शनमधून सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक  नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद करणे आवश्यक शेतकर्‍यांनी दोन ते तीन बँकांकडून कर्ज घेतले आहे.  कर्जमाफीच्या अर्जात ज्या बँकेचे कर्ज जास्त आहे, त्याची  नोंद केली आहे; मात्र शेतकर्‍यांनी दिलेले अर्ज सर्व बँकेकडे  जाणार असून, एखाद्या बँकेतील कर्जाची नोंद नसली तर  अर्ज रद्द करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेव्य ितरिक्त इतर बँकांकडून कर्ज घेतले असले, तरी त्यांना १.५0  लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास् तीत जास्त कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी जिल्हा बँक  आणि इतर बँकेकडे आधार कार्ड, के.वाय.सी.कागदपत्रे  द्यावीत, शेतकर्‍यांनी एकापेक्षा जास्त बँकांकडून कर्ज घे तलेली असतील व एकाच बँकेच्या कर्जाचा ऑनलाइन  अर्जामध्ये उल्लेख केला असेल, अशा शेतकर्‍यांनी त्यांच्या  अर्जामध्ये दुरुस्ती करून जिल्हा बँकेसह सर्वच बँकांच्या  कर्जाची व बचत खात्याची माहिती सुविधा केंद्रावर जाऊन  ऑनलाइन अर्जामध्ये अपडेट करुन घेणे आवश्यक आहे. 

आधार कार्ड बँकेत देणे आवश्यक  शेतकर्‍यांनी बँकेमध्ये कर्जखात्याला आधार कार्ड लिंक  करणे आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक केले नाही तर  वंचित राहावे लागणार आहे. -