शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शेती कर्जांची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:52 IST

बुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें तर्गत कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जांची  माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांनी विविध  बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खा त्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये  जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न  भरल्यास अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे.

ठळक मुद्देकर्जमाफी अर्जामध्ये शेतकर्‍यांनी सर्व बँकांकडील कर्जाची  माहिती देणे अनिवार्यजिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद करणे आवश्यक 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें तर्गत कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जांची  माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांनी विविध  बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खा त्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये  जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न  भरल्यास अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे. सर्व बँकांच्या कर्जाची नोंद करण्याकरिता शेतकर्‍यांना  नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून, त्याच अर्जामध्ये एडीट  ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी लागणार आहे. अर्ज सादर  करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक व ग्रामीण बँक अशा  सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या सर्व प्रकारच्या  कर्जाची माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी  लागणार आहे. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली  नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार  कारवाई करण्यात येणार आहे. अर्ज सादर करताना सर्व  बँकांकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे  अनिवार्य आहे. सदर माहिती सादर न केल्यास व अर्जदाराचा  अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र राहिल्यास त्याला अर्जदार  जबाबदार राहणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी अशी माहिती  सादर केली नाही, त्यांनी ती त्वरित ऑनलाइन एडीट ऑ प्शनमधून सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक  नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद करणे आवश्यक शेतकर्‍यांनी दोन ते तीन बँकांकडून कर्ज घेतले आहे.  कर्जमाफीच्या अर्जात ज्या बँकेचे कर्ज जास्त आहे, त्याची  नोंद केली आहे; मात्र शेतकर्‍यांनी दिलेले अर्ज सर्व बँकेकडे  जाणार असून, एखाद्या बँकेतील कर्जाची नोंद नसली तर  अर्ज रद्द करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेव्य ितरिक्त इतर बँकांकडून कर्ज घेतले असले, तरी त्यांना १.५0  लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास् तीत जास्त कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी जिल्हा बँक  आणि इतर बँकेकडे आधार कार्ड, के.वाय.सी.कागदपत्रे  द्यावीत, शेतकर्‍यांनी एकापेक्षा जास्त बँकांकडून कर्ज घे तलेली असतील व एकाच बँकेच्या कर्जाचा ऑनलाइन  अर्जामध्ये उल्लेख केला असेल, अशा शेतकर्‍यांनी त्यांच्या  अर्जामध्ये दुरुस्ती करून जिल्हा बँकेसह सर्वच बँकांच्या  कर्जाची व बचत खात्याची माहिती सुविधा केंद्रावर जाऊन  ऑनलाइन अर्जामध्ये अपडेट करुन घेणे आवश्यक आहे. 

आधार कार्ड बँकेत देणे आवश्यक  शेतकर्‍यांनी बँकेमध्ये कर्जखात्याला आधार कार्ड लिंक  करणे आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक केले नाही तर  वंचित राहावे लागणार आहे. -