शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

सर्व शेती कर्जांची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:52 IST

बुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें तर्गत कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जांची  माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांनी विविध  बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खा त्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये  जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न  भरल्यास अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे.

ठळक मुद्देकर्जमाफी अर्जामध्ये शेतकर्‍यांनी सर्व बँकांकडील कर्जाची  माहिती देणे अनिवार्यजिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद करणे आवश्यक 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें तर्गत कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जांची  माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांनी विविध  बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खा त्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये  जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न  भरल्यास अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे. सर्व बँकांच्या कर्जाची नोंद करण्याकरिता शेतकर्‍यांना  नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून, त्याच अर्जामध्ये एडीट  ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी लागणार आहे. अर्ज सादर  करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक व ग्रामीण बँक अशा  सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या सर्व प्रकारच्या  कर्जाची माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी  लागणार आहे. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली  नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार  कारवाई करण्यात येणार आहे. अर्ज सादर करताना सर्व  बँकांकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे  अनिवार्य आहे. सदर माहिती सादर न केल्यास व अर्जदाराचा  अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र राहिल्यास त्याला अर्जदार  जबाबदार राहणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी अशी माहिती  सादर केली नाही, त्यांनी ती त्वरित ऑनलाइन एडीट ऑ प्शनमधून सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक  नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद करणे आवश्यक शेतकर्‍यांनी दोन ते तीन बँकांकडून कर्ज घेतले आहे.  कर्जमाफीच्या अर्जात ज्या बँकेचे कर्ज जास्त आहे, त्याची  नोंद केली आहे; मात्र शेतकर्‍यांनी दिलेले अर्ज सर्व बँकेकडे  जाणार असून, एखाद्या बँकेतील कर्जाची नोंद नसली तर  अर्ज रद्द करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेव्य ितरिक्त इतर बँकांकडून कर्ज घेतले असले, तरी त्यांना १.५0  लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास् तीत जास्त कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी जिल्हा बँक  आणि इतर बँकेकडे आधार कार्ड, के.वाय.सी.कागदपत्रे  द्यावीत, शेतकर्‍यांनी एकापेक्षा जास्त बँकांकडून कर्ज घे तलेली असतील व एकाच बँकेच्या कर्जाचा ऑनलाइन  अर्जामध्ये उल्लेख केला असेल, अशा शेतकर्‍यांनी त्यांच्या  अर्जामध्ये दुरुस्ती करून जिल्हा बँकेसह सर्वच बँकांच्या  कर्जाची व बचत खात्याची माहिती सुविधा केंद्रावर जाऊन  ऑनलाइन अर्जामध्ये अपडेट करुन घेणे आवश्यक आहे. 

आधार कार्ड बँकेत देणे आवश्यक  शेतकर्‍यांनी बँकेमध्ये कर्जखात्याला आधार कार्ड लिंक  करणे आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक केले नाही तर  वंचित राहावे लागणार आहे. -