शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चीन, अमेरिकेपेक्षा भारताचा जीडीपी अधिक - राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

By निलेश जोशी | Updated: January 8, 2024 20:10 IST

बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला दावा : दहा वर्षांत दरडोई उत्पन्नही दुपटीने वाढले

बुलढाणा : एकीकडे देशावर १५० लाख कोटी रुपयांचे कर्ज असतानाच देशाचा जीडीपी चीन, अमेरिकेपेक्षा अधिक असल्याचा दावा करत गेल्या दहा वर्षांत देशाचे दरडोई उत्पन्न ९० हजारांवरून १ लाख ८८ हजारांवर गेले आहे. जवळपास दुपटीने त्यात वाढ झाल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे सांगितले.

बुलढाणा येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त ८ जानेवारी रोजी ते आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला तेव्हा हे वक्तव्य त्यांनी केली. यावेळी आ. संजय गायकवाड, श्वेता महाले, माजी आ. चैनसुख संचेती, माजी आ. विजयराज शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. कोविडनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेने वेग घेतला असून, महागाईचा दरही कमी झाल्याचे कराड म्हणाले. पायाभूत सुविधांचा वेग वाढत आहे. 

देशाने विकासाकडे वाटचाल केली असून, इंग्रजकालीन गुलामीची चिन्हे दूर सारून भारतीय दृष्टिकोन जपत विकासाचा मार्ग आपण पादाक्रांत करत आहोत. त्यामुळेच कायद्यामध्येही त्यानुषंगाने ३९ हजार सुधारणा केल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे ज्या पद्धतीने पायाभूत सुविधांच्या कामांनी वेग घेतला आहे ते पाहता जनसामान्यांच्या राहणीमानात वाढ होऊन विकासाची संकल्पना स्पष्ट होत आहे. महसुली उत्पन्नही वाढले आहे. 

पूर्वी दहाव्या क्रमांकावर असलेली आपली अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आली असून, २०२६ पर्यंत ती तिसऱ्या स्थानावर जाईल, असे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले. केंद्रात २०१४ मध्ये आम्ही आलो तेव्हा देशाचे बजेट १६ लाख कोटी रुपयांचे होते, ते आज ४५ लाख कोटींच्या घरात गेले आहे. अर्थात त्यातही तिपटीने वाढ झाल्याचे कराड म्हणाले.

महाविकास आघाडीवर टीकाविकसित भारत संकल्प यात्रेला काही ठिकाणी रोखले जात आहे. यासंदर्भाने विचारले असता हे काम महाविकास आघाडीचे असल्याचा आरोप त्यांनी अनुषंगिक विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवत