शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:42 IST

केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांना सर्वच पिकांसाठी लागत खर्चाच्या आधारावर लाभकारी मूल्य ...

केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांना सर्वच पिकांसाठी लागत खर्चाच्या आधारावर लाभकारी मूल्य मिळत नाही. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बाजारव्यवस्था विकसित करण्यात आलेली नाही. भारतीय शेतकरी हा कर्जबाजारी व दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे. सरकारने घोषित केलेल्या भावानेच धान्य खरेदी करण्यात यावी, त्याच्यापेक्षा कमी भावाने खरेदी केल्यास त्याबाबत कठोर कायदा करण्यात यावा. आदी मागण्यांसाठी भारतीय किसान संघाचे देशव्यापी धरणे आंदोलन ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले. त्याला पाठिंबा म्हणून भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. या आंदोलनात भारतीय किसान संघाचे प्रांत उपाध्यक्ष मुकुटराव भिसे, प्रांत महामंत्री बाबुराव देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रशांत गुप्ता, सुरेंद्र गावंडे, जिल्हामंत्री कैलास ढोले, राजेंद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार खडके, मुकुंद वानखेडे, अर्जुनराव गारोडे, कार्यकारिणी सदस्य वसंत मिरगे, एकनाथ हेलगे, ज्ञानदेव मुकुंद, गजानन सावतकार, प्रवीण बगाडे, मधुकर भारसाकळे, विजय सावळे आदींनी सहभाग घेतला़