शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

जागतिक विज्ञानाचा पाया भारतानेच रचला - जयंत सहस्त्रबुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 16:20 IST

‘विज्ञान भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री जयंत सहस्त्रबुद्धे यांच्याशी साधलेला संवाद...

अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  प्राचीन काळापासून भारतीय सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. योग, अध्यात्म, गणित आणि विज्ञानाचाही पाया भारतीयांनीच रचला आहे. जागतिक विज्ञानात भारताची मोठी देणगी आहे. भारतातील आधुनिक तंत्रज्ञानाची व प्राचीन विज्ञानाची लोकप्रियता वाढविणे हाच ‘विज्ञान भारती’चा मुख्य उद्देश आहे. देशी आंदोलन म्हणूनही ‘विज्ञान भारती’ची वेगळी ओळख आहे. ‘विज्ञान भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री जयंत सहस्त्रबुद्धे यांच्याशी साधलेला संवाद...

भारतीय विज्ञानासमोरील आव्हाने कोणती?आजच्या स्थितीत जे विज्ञान आपल्याला दिसतेय ते पाश्चिमात्य विज्ञानाचे प्रतिबिंब आहे. यामुळे एक आभासी चित्र निर्माण झाले असून, आजचे विज्ञान हे संपूर्ण आयात केलेले विज्ञान आहे. यामुळे भारतीय युवकाच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे की, भारतामध्ये जणू कधी विज्ञान नव्हतेच. स्वकीय विज्ञानाबद्दल भारतीयांमध्ये आस्था निर्माण करणे आणि भारतीय विज्ञानाचा अभिमान वाटावा ही भावना निर्माण करणे, हे मुख्य आव्हान भारतीय विज्ञानासमोरील आहे.

जागतिक विज्ञान क्षेत्रात भारताचे स्थान काय?नासासारख्या प्रतिष्ठित विज्ञान संस्थेमध्ये भारतीय वैज्ञानिकांची संख्या उल्लेखनीय आहे. डॉ. होमी भाभा, डॉ. बोस, डॉ. सी. व्ही. रमन, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, जयंत नारळीकर अशी एका पाठोपाठा एक अनेक नावे जागतिक स्तरावर भारतीय वैज्ञानिकांची सांगता येतील; परंतु हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे. व्यापक दृष्टीने बघायचे झाल्यास आज वैश्विक स्तरावर संगणक क्षेत्रामध्ये जी ‘बायनरी कोड’ लँग्वेज वापरली जाते. ही जागतिक विज्ञानाला भारताची मोठी देणगी आहे.

‘विज्ञान भारती’ची स्थापना कधी झाली?विज्ञान भारती ही देशातील एक अशासकीय संस्था आहे. ‘विज्ञान भारती’ची स्थापना जबलपूर येथे सन १९९१-९२ साली करण्यात आली आहे. प्रा. के. वासू यांच्या नेतृत्वात स्थापन झालेली विज्ञान भारती ही संस्था प्राचीन आणि देशी विज्ञानाची एक गतिशील चळवळ म्हणून झपाट्याने पुढे येत आहे. खामगावातदेखील विज्ञान भारती संलग्नीत नागार्जुन विज्ञान व पर्यावरण मंच डॉ. दीपक नागरिक यांच्या नेतृत्वात कार्यान्वित करण्यात आला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत