शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

तूर नोंदणी, टोकनसाठी चिखली बाजार समितीत स्वतंत्र कक्ष

By admin | Updated: May 20, 2017 00:22 IST

चिखली: चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तूर नोंदणी व टोकणसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: सरकारने तूर खरेदीसाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे; मात्र पावसाचा फटका बसून यार्डातील तुरीचे नुकसान होऊ नये यासाठी पूर्व नियोजन म्हणून चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तूर नोंदणी व टोकणसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केले आहे.चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यो १३ काट्यांवर २२ एप्रिल पर्यंत आलेल्या सर्व तुरीची खरेदी जवळपास आटोपली आहे. दरम्यान, सरकारने तूर खरेदीस ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने या मुदतवाढीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा तसेच तुरीला मोसमी पावसाचा फटका बसून नुकसान होऊ नये यासाठी पूर्व नियोजन म्हणून बाजार समितीने तूर नोंदणी व टोकणसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी मुख्य कार्यालयात करावी, नोंदणीनुसार यार्डवर प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांस टोकन देण्यात येऊन तुरीचे मोजमाप केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टळणार आहे. या केंद्रावर आतापर्यंत २ हजार १०० शेतकऱ्यांनी नोंद केली असून, आणखी ४० हजार क्विंटलची आवक अपेक्षित असल्याने अतिरिक्त वजनकाटे वाढविण्यात आले आहेत. बारदाना उपलब्ध झाल्यास दररोज १५०० क्विंटलपेक्षा जास्त वजनमाप होणार आहे व त्यानुसार शेतकऱ्यांना समितीकडून फोनद्वारे कळविण्यात येणार आहे. तसेच यार्डातील सूचना फलकावरही संभाव्य यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर बाजार हस्तक्षेप योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तहसीलदार मनीष गायकवाड, सचिव संदीप रुद्राक्ष, बाजार समितीचे सचिव अजय मिरकड या त्रिसदस्यीय समितीचीही देखरेख राहणार असल्याने या सुविधेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. भुसारी यांनी केले आहे. तुरीची तातडीने खरेदी करा : स्वाभिमानी संघटनाशासनाने तूर खरेदीस ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शेतकऱ्यांकडील ४० हजार क्विंटल तुरीची नोंद बाजार समितीकडे झालेली आहे; मात्र असे असताना चिखली केंद्रावर तूर खरेदी बंद असल्याने नोंद झालेल्या शेतकऱ्यांची तूर तत्काळ खरेदी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तहसीलदार मनीष गायकवाड यांच्याकडे १९ रोजी केली आहे. यावेळी बाजार समितीचे सचिव मिरकड, सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, सहायक निबंधक रूद्राक्ष, स्वाभिमानीचे दीपक सुरडकर, भारत वाघमारे, भरत जोगदंडे आदी उपस्थित होते.