शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नदी पात्रात वाढले अतिक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:40 IST

हनुमान जगताप।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शासनाच्यावतीने धोक्याचे क्षेत्र घोषित केले असताना, मलकापुरातील नळगंगा नदीच्या पात्रात मागील काही वर्षांत अतिक्रमित घरांची संख्या लक्षवेधी स्वरूपात वाढली आहे. अशात नदीला पूर आल्यास मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा हवामान खात्याने ज्यादा पावसाची शक्यता वर्तविल्याने नदीपात्रातील ‘त्या’ तीनशेवर कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ...

ठळक मुद्देनळगंगेला पूर आल्यास पात्रातील अतिक्रमकांना धोका

हनुमान जगताप।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शासनाच्यावतीने धोक्याचे क्षेत्र घोषित केले असताना, मलकापुरातील नळगंगा नदीच्या पात्रात मागील काही वर्षांत अतिक्रमित घरांची संख्या लक्षवेधी स्वरूपात वाढली आहे. अशात नदीला पूर आल्यास मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा हवामान खात्याने ज्यादा पावसाची शक्यता वर्तविल्याने नदीपात्रातील ‘त्या’ तीनशेवर कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते.यासंदर्भात अधिक माहिती अशी, की शहराच्या पूर्वभागातून नळगंगा नदी वाहते. महापुरामुळे नदीकाठच्या घरांना संकटाचा सामना करावा लागू नये, याकरिता शासनाच्यावतीने नदीपात्रास धोक्याचे क्षेत्र घोषित केल्याची माहिती आहे. असे असताना मागील काही वर्षात नळगंगा मायीच्या पात्रात दोन्ही बाजूंनी अतिक्रमित घरांची संख्या लक्षवेधी स्वरूपात वाढल्याची परिस्थिती आहे.शहरात प्रामुख्याने गाडेगाव, जावईनगर, सालीपुरा, धनगरपुरा, सुभाषचंद्र बोस नगर, पारपेठ, मोहनपुरा, म्हाडा कॉलनी या भागात नदी पात्रातच अनेकांनी अतिक्रमण करून घरे थाटली आहेत, तर काही नागरिकांनी व्यावसायिक दुकाने देखील त्यात थाटली आहेत. एकंदरित त्या घरांची संख्या सुमारे तीनशेवर असल्याची माहिती असून, तेवढीच कुटुंब त्यातून वास्तव्य करताना दिसतात. अशा परिस्थितीत बुलडाणा घाट, मोताळा व मलकापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यास नळगंगेला महापूर येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नदीपात्रातील त्या घरांची पर्यायाने वास्तव्य करणाºया कुटुंबातील नागरिकांची मोठ्या प्रकारची जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना प्रशासनाचे त्याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे.दरवर्षी शासनाच्यावतीने संबंधित विभागामार्फत नळगंगा मायीच्या पात्रातील अतिक्रमिकांना सूचना देण्यात येतात. मात्र, कारवाई केल्या जात नाही, हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत नदीपात्रातील वास्तव्य त्या कुटुंबांच्या अंगाशी येऊ शकते. ही बाब गंभीर असताना नागरिकांकरवी प्रामुख्याने शासनाच्यावतीने त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.