शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
3
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
4
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
5
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
6
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
7
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
8
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
9
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
10
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
11
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
12
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
13
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
14
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
15
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
16
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
17
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
18
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
19
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
20
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा

नदी पात्रात वाढले अतिक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:40 IST

हनुमान जगताप।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शासनाच्यावतीने धोक्याचे क्षेत्र घोषित केले असताना, मलकापुरातील नळगंगा नदीच्या पात्रात मागील काही वर्षांत अतिक्रमित घरांची संख्या लक्षवेधी स्वरूपात वाढली आहे. अशात नदीला पूर आल्यास मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा हवामान खात्याने ज्यादा पावसाची शक्यता वर्तविल्याने नदीपात्रातील ‘त्या’ तीनशेवर कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ...

ठळक मुद्देनळगंगेला पूर आल्यास पात्रातील अतिक्रमकांना धोका

हनुमान जगताप।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शासनाच्यावतीने धोक्याचे क्षेत्र घोषित केले असताना, मलकापुरातील नळगंगा नदीच्या पात्रात मागील काही वर्षांत अतिक्रमित घरांची संख्या लक्षवेधी स्वरूपात वाढली आहे. अशात नदीला पूर आल्यास मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा हवामान खात्याने ज्यादा पावसाची शक्यता वर्तविल्याने नदीपात्रातील ‘त्या’ तीनशेवर कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते.यासंदर्भात अधिक माहिती अशी, की शहराच्या पूर्वभागातून नळगंगा नदी वाहते. महापुरामुळे नदीकाठच्या घरांना संकटाचा सामना करावा लागू नये, याकरिता शासनाच्यावतीने नदीपात्रास धोक्याचे क्षेत्र घोषित केल्याची माहिती आहे. असे असताना मागील काही वर्षात नळगंगा मायीच्या पात्रात दोन्ही बाजूंनी अतिक्रमित घरांची संख्या लक्षवेधी स्वरूपात वाढल्याची परिस्थिती आहे.शहरात प्रामुख्याने गाडेगाव, जावईनगर, सालीपुरा, धनगरपुरा, सुभाषचंद्र बोस नगर, पारपेठ, मोहनपुरा, म्हाडा कॉलनी या भागात नदी पात्रातच अनेकांनी अतिक्रमण करून घरे थाटली आहेत, तर काही नागरिकांनी व्यावसायिक दुकाने देखील त्यात थाटली आहेत. एकंदरित त्या घरांची संख्या सुमारे तीनशेवर असल्याची माहिती असून, तेवढीच कुटुंब त्यातून वास्तव्य करताना दिसतात. अशा परिस्थितीत बुलडाणा घाट, मोताळा व मलकापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यास नळगंगेला महापूर येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नदीपात्रातील त्या घरांची पर्यायाने वास्तव्य करणाºया कुटुंबातील नागरिकांची मोठ्या प्रकारची जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना प्रशासनाचे त्याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे.दरवर्षी शासनाच्यावतीने संबंधित विभागामार्फत नळगंगा मायीच्या पात्रातील अतिक्रमिकांना सूचना देण्यात येतात. मात्र, कारवाई केल्या जात नाही, हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत नदीपात्रातील वास्तव्य त्या कुटुंबांच्या अंगाशी येऊ शकते. ही बाब गंभीर असताना नागरिकांकरवी प्रामुख्याने शासनाच्यावतीने त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.