शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:50 IST

बुलडाणा : जिल्ह्यात दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तूर साेंगणी करून ...

बुलडाणा : जिल्ह्यात दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तूर साेंगणी करून शेतात ठेवली आहे. पाऊस आल्यास तूर भिजण्याची शक्यता आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.

सततच्या पावसामुळे खरिपातील जवळपास सर्वच पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तूर पिकाकडून शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणात आस आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी तुरीची साेंगणी करून शेतात ठेवली आहे. दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. त्यामुळे साेंगणी करून ठेवलेली तूर घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. धुक्यामुळे हरभरा पिकाची फुले गळण्याची शक्यता आहे. पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान हाेण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धाेक्यात सापडली आहेत. हरभरा पिकावर अळ्यांचे आक्रमण झाल्यास उत्पादन घटण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

काेट

दाट धुक्यामुळे हरभरा पिकाची फुले गळण्याची शक्यता आहे. पावसामुळे रब्बी पिकांना नुकसान हाेणार नाही. साेंगणी केलेल्या तुरीचे पावसामुळे नुकसान हाेऊ शकते.

- सी.पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा