शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसामुळे जलसाठय़ात वाढ!

By admin | Updated: October 3, 2016 02:46 IST

खामगाव तालुक्यातील रब्बी पिकांसाठी वाढता जलसाठा उपयुक्त.

खामगाव (जि. बुलडाणा), दि. २- गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने दमदार पुनरागमन केल्याने जलसाठय़ात अपेक्षित वाढ झाली आहे. वाढत्या जलसाठा रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणार असून, सिंचन क्षेत्रामध्ये नक्कीच वाढ होईल. परतीचा पाऊस असाच तालुक्यातील काही दिवस कायम राहिल्यास यावर्षी सर्वच प्रकल्प तुडुंब होण्याची शक्यता वाढली आहे.यावर्षीचा पावसाळा जूनपासून समाधानकारक राहिला. ऑगस्ट महिन्यातील दडी वगळता पावसाने यंदा चांगली साथ दिली आहे. दमदार पावसाच्या आगमनाने मागील तीन वर्षात प्रथमच जुलै महिन्यात नदी-नाले दुथडी भरुन वाहले. खरीप हंगामातील पिकेही जोमाने बाहेर निघाली. मूग, उडिदाचे उत्पादन चांगल्यापैकी असून, पावसाच्या दडीचा सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले होते. तर तालुक्यातील धरणातील जलसाठय़ाची वाढ थांबली होती. मागील पंधरा दिवसाअगोदर तालुक्यातील मन प्रकल्पात ६७ टक्के जलसाठा होता. तर तोरणा प्रकल्पात ३८ टक्के, ढोरपगाव ८७ टक्के व ज्ञानगंगा प्रकल्पात ४४ टक्के जलसाठा होता. केवळ मस प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. मात्र मागील आठवड्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे आठवडाभरातच जलसाठय़ात अ पेक्षित वाढ झाली आहे. मन प्रकल्पात सद्यस्थितीत ८२ टक्के जलसाठा झाला आहे. या परिसरात आतापर्यंत ६३0 मि.मी. पावसाची नोंद आहे. तोरणा प्रकल्पात ६२५ मि.मी. पाऊस होऊन जलसाठा ४६.७८ टक्के आहे. ढोरपगाव प्रकल्प १00 टक्के भरला असून, सध्या या प्रकल्पातून ५ सेमी पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खामगाव शहराला पाणी पुरवठा करण्याच्या ज्ञानगंगा प्रकल्पात घसघशीत वाढ होऊन जलसाठा ५८.0६ टक्के झाला आहे. या परिसरात आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक कमी ३३0 मि.मी. पावसाची नोंद आहे. लघुप्रकल्प बोरजवळामध्ये ५१.६0 टक्के, गारडगाव ८३.८३ टक्के, लांजुड ६८.२९ टक्के, पिंप्री गवळी ९७.१३ टक्के, तर टाकळी तलावात १00 टक्के साठा होऊन, यामधून २ से.मी. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परतीच्या पावसामुळे नदी-नाले पुन्हा दुथडी भरुन वाहू लागले असून, धरणामध्ये जलसाठा लवकरच वाढण्याची शक्य ता आहे.ढोरपगाव मन प्रकल्पांतर्गत नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारापरतीच्या पावसामुळे तालुक्यातील जलसाठय़ात अपेक्षित वाढ होत आहे. शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पात सद्यस्थितीत ८२ टक्के जलसाठा झाला असून, परतीचा पाऊस सुरु राहिल्यास धोक्याची पाणीपातळी ओलांडली जाऊ शकते. त्यामुळे सुरक्षितता म्हणून मन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. तसेच ढोरपगाव लघू प्रकल्प ओव्हर फ्लो होऊन, यामधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या प्रकल्पालगतही सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत.परतीच्या पावसामुळे तालुक्यातील प्रकल्पात अपेक्षित जलसाठा वाढत आहे. सुरक्षितता म्हणून मन प्रकल्प व ढोरपगाव लघू प्रकल्पांतर्गत येणार्‍या धोक्याच्या गावांना सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील वाढत्या जलसाठय़ावर विभाग लक्ष ठेवून आहे.- पी.यू. सरदारउपविभागीय अधिकारीमन प्रकल्प उपविभाग, शिर्ला नेमाने