शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शेणखताच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:34 IST

दुसरीकडे गायरान जमिनीही आता वहितीखाली आणल्या जात आहेत. त्याचाही परिणाम शेणखताची मागणी वाढण्यात आला आहे. दरम्यान, काही शेतकरी कसदार ...

दुसरीकडे गायरान जमिनीही आता वहितीखाली आणल्या जात आहेत. त्याचाही परिणाम शेणखताची मागणी वाढण्यात आला आहे. दरम्यान, काही शेतकरी कसदार जमिनीचा पोत ढासळू नये, यासाठी शेणखतावर भर देताना दिसत आहेत. पूर्वी जमिनीत शेतकरी शेणखत टाकत असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात रासायनिक खताचा वापर होत असे; परंतु दिवसेंदिवस चाराटंचाईमुळे गुरांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने शेणखत मिळेनासे झाले आहे. रासायनिक खताचा वापर अमर्याद झाला असून शेती व्यवसायात तंत्रज्ञान आले आहे. अधिकाधिक पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरीवर्गाकडून रासायनिक खताचा अमाप वापरामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याऐवजी उलट जमिनीचा पोत खालावत आहे. त्यातच खरीप व रब्बी हंगामात सर्व पिकांना रासायनिक खताचा डोस दिल्याशिवाय अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, अशी धारणा वाढीला लागली आहे. पूर्वी शेतकऱ्याकडे जोडधंदा म्हणून गाई, म्हशी, बैल पूर्वी असत. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर अधिक केल्या जात होता. परंतु कालांतराने गुरांना चराईचे क्षेत्र कमी झाल्याने गुरांची संख्या घटली. शेतीला यंत्राच्या साह्याने शेतकऱ्याकडून शेती उपयोगी कामे केली जात असल्यामुळे अल्प शेतकऱ्यांकडे बैल पहावयास मिळतात.

सध्याचे दर...

एका ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी तीन हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामध्ये खत भरण्याची मजुरी वेगळी आहे. बैलगाडीसाठी ५०० रुपये आकारले जात आहेत. यापूर्वी शेणखत सहजतेने उपलब्ध होत होते. मात्र, आता त्याची उपलब्धता कमी झाल्याने त्यालाही भाव आला आहे.

--ज्वारीचा पेरा घडल्याने वैरणाची समस्या--

जिल्ह्यात अलीकडली काळात ज्वारीचा पेरा घटला आहे. त्यामुळे गुरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी पशुधनही जिल्ह्यात कमी होत आहे. त्याचा परिणाम शेणखत उपलब्धतेवर होत आहे.

--यांत्रिकीकरणात वाढ--

कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. जिल्ह्यातील १२७२ गावांमध्ये सरासरी २२ ट्रॅक्टर सध्या उपलब्ध आहेत. त्याद्वारेच शेतीची कामे केली जातात. त्यामुळे बैलांचाही वापर शेतात कमी झाला आहे. त्याचा फटकाही शेणखताचे दर वाढण्यात झाला असल्याचे चित्र आहे.