शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

शेणखताच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:34 IST

दुसरीकडे गायरान जमिनीही आता वहितीखाली आणल्या जात आहेत. त्याचाही परिणाम शेणखताची मागणी वाढण्यात आला आहे. दरम्यान, काही शेतकरी कसदार ...

दुसरीकडे गायरान जमिनीही आता वहितीखाली आणल्या जात आहेत. त्याचाही परिणाम शेणखताची मागणी वाढण्यात आला आहे. दरम्यान, काही शेतकरी कसदार जमिनीचा पोत ढासळू नये, यासाठी शेणखतावर भर देताना दिसत आहेत. पूर्वी जमिनीत शेतकरी शेणखत टाकत असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात रासायनिक खताचा वापर होत असे; परंतु दिवसेंदिवस चाराटंचाईमुळे गुरांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने शेणखत मिळेनासे झाले आहे. रासायनिक खताचा वापर अमर्याद झाला असून शेती व्यवसायात तंत्रज्ञान आले आहे. अधिकाधिक पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरीवर्गाकडून रासायनिक खताचा अमाप वापरामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याऐवजी उलट जमिनीचा पोत खालावत आहे. त्यातच खरीप व रब्बी हंगामात सर्व पिकांना रासायनिक खताचा डोस दिल्याशिवाय अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, अशी धारणा वाढीला लागली आहे. पूर्वी शेतकऱ्याकडे जोडधंदा म्हणून गाई, म्हशी, बैल पूर्वी असत. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर अधिक केल्या जात होता. परंतु कालांतराने गुरांना चराईचे क्षेत्र कमी झाल्याने गुरांची संख्या घटली. शेतीला यंत्राच्या साह्याने शेतकऱ्याकडून शेती उपयोगी कामे केली जात असल्यामुळे अल्प शेतकऱ्यांकडे बैल पहावयास मिळतात.

सध्याचे दर...

एका ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी तीन हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामध्ये खत भरण्याची मजुरी वेगळी आहे. बैलगाडीसाठी ५०० रुपये आकारले जात आहेत. यापूर्वी शेणखत सहजतेने उपलब्ध होत होते. मात्र, आता त्याची उपलब्धता कमी झाल्याने त्यालाही भाव आला आहे.

--ज्वारीचा पेरा घडल्याने वैरणाची समस्या--

जिल्ह्यात अलीकडली काळात ज्वारीचा पेरा घटला आहे. त्यामुळे गुरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी पशुधनही जिल्ह्यात कमी होत आहे. त्याचा परिणाम शेणखत उपलब्धतेवर होत आहे.

--यांत्रिकीकरणात वाढ--

कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. जिल्ह्यातील १२७२ गावांमध्ये सरासरी २२ ट्रॅक्टर सध्या उपलब्ध आहेत. त्याद्वारेच शेतीची कामे केली जातात. त्यामुळे बैलांचाही वापर शेतात कमी झाला आहे. त्याचा फटकाही शेणखताचे दर वाढण्यात झाला असल्याचे चित्र आहे.