शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेणखताच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:34 IST

दुसरीकडे गायरान जमिनीही आता वहितीखाली आणल्या जात आहेत. त्याचाही परिणाम शेणखताची मागणी वाढण्यात आला आहे. दरम्यान, काही शेतकरी कसदार ...

दुसरीकडे गायरान जमिनीही आता वहितीखाली आणल्या जात आहेत. त्याचाही परिणाम शेणखताची मागणी वाढण्यात आला आहे. दरम्यान, काही शेतकरी कसदार जमिनीचा पोत ढासळू नये, यासाठी शेणखतावर भर देताना दिसत आहेत. पूर्वी जमिनीत शेतकरी शेणखत टाकत असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात रासायनिक खताचा वापर होत असे; परंतु दिवसेंदिवस चाराटंचाईमुळे गुरांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने शेणखत मिळेनासे झाले आहे. रासायनिक खताचा वापर अमर्याद झाला असून शेती व्यवसायात तंत्रज्ञान आले आहे. अधिकाधिक पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरीवर्गाकडून रासायनिक खताचा अमाप वापरामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याऐवजी उलट जमिनीचा पोत खालावत आहे. त्यातच खरीप व रब्बी हंगामात सर्व पिकांना रासायनिक खताचा डोस दिल्याशिवाय अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, अशी धारणा वाढीला लागली आहे. पूर्वी शेतकऱ्याकडे जोडधंदा म्हणून गाई, म्हशी, बैल पूर्वी असत. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर अधिक केल्या जात होता. परंतु कालांतराने गुरांना चराईचे क्षेत्र कमी झाल्याने गुरांची संख्या घटली. शेतीला यंत्राच्या साह्याने शेतकऱ्याकडून शेती उपयोगी कामे केली जात असल्यामुळे अल्प शेतकऱ्यांकडे बैल पहावयास मिळतात.

सध्याचे दर...

एका ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी तीन हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामध्ये खत भरण्याची मजुरी वेगळी आहे. बैलगाडीसाठी ५०० रुपये आकारले जात आहेत. यापूर्वी शेणखत सहजतेने उपलब्ध होत होते. मात्र, आता त्याची उपलब्धता कमी झाल्याने त्यालाही भाव आला आहे.

--ज्वारीचा पेरा घडल्याने वैरणाची समस्या--

जिल्ह्यात अलीकडली काळात ज्वारीचा पेरा घटला आहे. त्यामुळे गुरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी पशुधनही जिल्ह्यात कमी होत आहे. त्याचा परिणाम शेणखत उपलब्धतेवर होत आहे.

--यांत्रिकीकरणात वाढ--

कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. जिल्ह्यातील १२७२ गावांमध्ये सरासरी २२ ट्रॅक्टर सध्या उपलब्ध आहेत. त्याद्वारेच शेतीची कामे केली जातात. त्यामुळे बैलांचाही वापर शेतात कमी झाला आहे. त्याचा फटकाही शेणखताचे दर वाढण्यात झाला असल्याचे चित्र आहे.