शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अल्पसंख्याक समाजात लसीकरण वाढविण्यासाठी राज्यात जनजागृतीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 17:22 IST

बुलडाणा: जिल्ह्यासह राज्यात अल्पसंख्याक समाजामध्ये गोवर रुबेला लसीकरणासंदर्भात असलेल्या गैरसमज व अफवामुळे या समाजातील मुला-मुलीमध्ये लसीकरणाचा टक्का वर्तमानात कमी असल्याचे चित्र आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा: जिल्ह्यासह राज्यात अल्पसंख्यांक समाजामध्ये गोवर रुबेला लसीकरणासंदर्भात असलेल्या गैरसमज व अफवामुळे या समाजातील मुला-मुलीमध्ये लसीकरणाचा टक्का वर्तमानात कमी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जम्मू काश्मिर सारख्या राज्यात तब्बल ९७ टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे रोग प्रतिबंधक लसीकरण निरीक्षण अधिकारी डॉ. मुजीब सय्यद यांनी दिली. दुसरीकडे गेल्या आठ ते दहा दिवसात महाराष्ट्रातील एक कोटी ८० हजार मुला-मुलींना गोवर, रुबेला लस देण्यात आली असून महाराष्ट्रात तीन कोटी ५० लाख मुला-मुलींना ही लस देण्यात येणार आहे. दक्षिण आशियातील १३ देशातून गोवर निर्मूलन आणि रुबेला नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कंबर कसलेली असतानाच भारतात फेब्रुवारी २०१७ पासून हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यातंर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये एकट्या जम्मु काश्मिर राज्यात ९७ टक्के लसीकरण झाले असल्याचे ते म्हणाले. काश्मिर विभागातही हे लसीकरण ९७ टक्के झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात आणि राज्यात काही ठिकाणी अल्पसंख्यांक समाजामध्ये लसीकरणासंदर्भात निर्माण झालेले गैरसमज, विद्यार्थ्यांना आलेल्या रिअ‍ॅक्शन व सोशल मिडीयात आधार नसलेले फिरत असलेले संदेश पाहता मोहीमेबाबत गैरसमज निर्माण झाले होते. अल्पसंख्यांकांच्या शाळामध्ये या लसीकरणाला विरोध झाला होता. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजातील मुला-मुलींमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. बुलडाणा जिल्ह्यातही हा टक्का कमी असल्याने अल्पसंख्यांक समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी तथा ‘गोवर, रुबेला लसीकरण: गैरसमज आणि तथ्ये’ हा मुद्दा घेऊन पाच ते सात डिसेंबर दरम्यान डॉ. सय्यद यांनी मुक्काम ठोकला होता. त्यानुषंगाने लसीकरण मोहिमेसंदर्भात सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली असता त्यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली. देशातील दक्षिणेतील राज्ये, गुजरात, हरियाणामध्ये लसीकरण पूर्ण झाले असून भारतातील लोकसंख्येच्या तुलनेत एक तृतियांश शून्य ते १५ वर्ष वयोगटातील मुले आहेत. या मुलांना प्रामुख्यने ही लस देण्यात येत आहे. जवळपास दहा वर्षे केलेल्या अभ्यासानंतर गोवर, रुबेलाचे संक्रमण हे याच वयोगाटील मुलांच्या माध्यमातून दुसर्यामध्ये होत असल्याचे स्पष्ट झाल्याने लसीकरणासाठी हा वयोगट निवडण्यात आला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे रोग प्रतिबंधक लसीकरण निरीक्षण अधिकारी डॉ. मुजीब सय्यद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गेल्या १३ वर्षापासून जागतिक आरोग्य संघटनेच्या लसीकरण कार्यक्रमाशी ते जुळलेले असून बांग्लादेशामध्येही त्यांनी रोहिंग्यांच्या निर्वासीत छावणीमध्येही लसीकरण केलेले आहे.

जागृती मोहिमेचा सकारात्मक परिणाम

आरोग्य विभागाने जिल्ह्यात अफवा आणि गैरसमजाचे निराकरण करण्यासाठी मोहिम हाती घेतल्याने त्याचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहे. मलकापूरसह चिखली व अन्य भागात अल्पसंख्यांक समाजातील मुली-मुलींना लसीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे. चिखली तालुक्यातील अंबाशी येथील अल्पसंख्यांक समाजाच्या शाळेमध्येतर ९५ टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती माता व बालसंगोपन विभागाचे डॉ. रविंद्र गोफणे यांनी दिली.

मराठी व उर्दू शाळेमधील मुलांना एकत्रीत लसीकरण

बुलडाणा शहरानजीकच्या देऊळघाट येथे तर जनमानसात निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी मराठी व उर्दू शाळेतील मुला-मुलींना एकत्रीत लसीकरण करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम पडत असून बुलडाणा जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजामधील मुला-मुलींमधील लसीकरणाचे अगदी शून्य ते दहा टक्क्यांवर असलेले प्रमाण आता सातत्याने वाढत असल्याची माहिती डॉ. रविंद्र गोफणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.