शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

जलसंधारणामुळे भूजल पातळीत वाढ

By admin | Updated: December 31, 2014 00:29 IST

बुलडाणा जिल्ह्यात सरासरी एक फूट वाढ : १३ पैकी पाच तालुक्यात घट.

हर्षनंदन वाघ / बुलडाणायावर्षी सरासरी पावसात घट निर्माण झाली असली तरी मागिल वर्षी जलसंधारण व गाळ काढण्याची कामे मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे जिल्ह्यात सरासरी भूजल पातळीमध्ये एक फूट वाढ झाली आहे, तर १३ तालुक्यांपैकी पाच तालुक्यात 0.४२ मीटर घट झाल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या प्रदूषणात झालेली वाढ, निसर्गाचा वाढलेला असमतोल, मोठय़ा प्रमाणात होत असलेली झाडांची कत्तल, त्यामुळे दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरी ३0 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तीव्र पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली होती. जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर व विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने सर्वत्र जलसंधारण व गाळ काढण्याचा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात राबविण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असून, आठ तालुक्यात 0.६६ मीटर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने जिल्ह्यातील १६७ निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण केले. त्यावरून जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यात सरासरी 0.६६ मीटर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चिखली तालुक्यात १४ निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले असून, 0.२३ मीटर वाढ दिसून आली. मेहकर तालुक्यात २१ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.५३ मीटर, सिंदखेडराजा तालुक्यात १३ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.५५ मीटर, मलकापूर तालुक्यातील १0 विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.७४ मीटर, मोताळा तालुक्यातील १३ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.६९ मीटर, नांदुरा तालुक्यातील १0 विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.४८ मीटर, जळगाव जामोद तालुक्यातील सात विहिरींचे सर्वेक्षण केले असता १.३५ मीटर, संग्रामपूर तालुक्यातील १४ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.७४ मीटर अशा प्रकारे आठ तालुक्यात 0.६६ मीटर भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.दरवर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्याच्या भूजल पातळीत १ फुट वाढ झाली आहे. मागिल वर्षी जिल्हाधिकारी कुरूंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले विविध जलसंधारणाची कामे व गाळ काढण्याच्या कामामुळे भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे , भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.व्ही.पी.कथने यांनी सांगीतले.