शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

जलसंधारणामुळे भूजल पातळीत वाढ

By admin | Updated: December 31, 2014 00:29 IST

बुलडाणा जिल्ह्यात सरासरी एक फूट वाढ : १३ पैकी पाच तालुक्यात घट.

हर्षनंदन वाघ / बुलडाणायावर्षी सरासरी पावसात घट निर्माण झाली असली तरी मागिल वर्षी जलसंधारण व गाळ काढण्याची कामे मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे जिल्ह्यात सरासरी भूजल पातळीमध्ये एक फूट वाढ झाली आहे, तर १३ तालुक्यांपैकी पाच तालुक्यात 0.४२ मीटर घट झाल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या प्रदूषणात झालेली वाढ, निसर्गाचा वाढलेला असमतोल, मोठय़ा प्रमाणात होत असलेली झाडांची कत्तल, त्यामुळे दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरी ३0 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तीव्र पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली होती. जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर व विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने सर्वत्र जलसंधारण व गाळ काढण्याचा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात राबविण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असून, आठ तालुक्यात 0.६६ मीटर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने जिल्ह्यातील १६७ निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण केले. त्यावरून जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यात सरासरी 0.६६ मीटर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चिखली तालुक्यात १४ निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले असून, 0.२३ मीटर वाढ दिसून आली. मेहकर तालुक्यात २१ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.५३ मीटर, सिंदखेडराजा तालुक्यात १३ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.५५ मीटर, मलकापूर तालुक्यातील १0 विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.७४ मीटर, मोताळा तालुक्यातील १३ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.६९ मीटर, नांदुरा तालुक्यातील १0 विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.४८ मीटर, जळगाव जामोद तालुक्यातील सात विहिरींचे सर्वेक्षण केले असता १.३५ मीटर, संग्रामपूर तालुक्यातील १४ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.७४ मीटर अशा प्रकारे आठ तालुक्यात 0.६६ मीटर भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.दरवर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्याच्या भूजल पातळीत १ फुट वाढ झाली आहे. मागिल वर्षी जिल्हाधिकारी कुरूंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले विविध जलसंधारणाची कामे व गाळ काढण्याच्या कामामुळे भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे , भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.व्ही.पी.कथने यांनी सांगीतले.