शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात कडधान्य पिकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:34 IST

बुलडाणा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात २०१८-१९ पासून पौष्टिक तृणधान्य व गळीतधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ...

बुलडाणा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात २०१८-१९ पासून पौष्टिक तृणधान्य व गळीतधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानासाठी निधीची तरतूद केंद्र व राज्य ६०-४० टक्के प्रमाणे आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य कडधान्य व गळीत धान्य पिकांचा समावेश या अभियानात करण्यात आला आहे.

पौष्टिक तृणधान्य पिके, नगदी पिकात कापूस पिकाचा समावेश आहे. अभियानामध्ये पीक प्रात्यक्षिके, पीक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके (आंतरपीक), मूलभूत बियाणे खरेदी (गळीत धान्य), प्रमाणित बियाणे वितरण व बियाणे उत्पादनास अर्थसाहाय्य, एकात्मिक कीड व अन्नद्रव्ये व्यवस्थापन, सुधारित कृषी औजारे व सिंचन साधन, पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण आदींचा समावेश आहे. शेतकऱ्यांचे शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी मिनी राइस मिल, मिनी दाल मिल (शेतकरी गटासाठी), बीज प्रक्रिया संच (FPO साठी), भातशेतीमध्ये मत्स्यपालन, तेलघाणी इ. घटकांची स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत अंमलबजावणी अभियान अंतर्गत केली जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत सन २०२१-२२ साठी अन्नधान्य पिकांसाठी रु. २२४८४.०० लाखांचा, गळीत धान्य व वृक्षजन्य तेलबिया पिकांसाठी रु. ७०६२.५५ लाखांचा आणि नगदी पिकांसाठी ७३९ लाख रुपयांचा कार्यक्रम मंजूर आहे.

महाडीबीटी पाेर्टलवर करावा लागणार अर्ज

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य/गळीत धान्य/नगदी पिके सन २०२१-२२ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये कडधान्य, गळीत धान्य व तृणधान्य पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन साधने या बाबींचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत. महाडीबीटी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांमधून मंजूर कार्यक्रमाच्या मर्यादेत लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

हा आहे याेजनेचा उद्देश

या योजनेचा उद्देश क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ करणे, जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविणे, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे हा आहे. तसेच अपारंपरिक भातपड क्षेत्रावर कडधान्य / गळीत धान्य पिकाच्या क्षेत्र वृद्धी व उत्पादकतेत वाढ करणे हा आहे.