शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

वादळी पावसाने केळी बागांचे नुकसान!

By admin | Updated: June 17, 2017 00:18 IST

केळी उत्पादक अडचणीत: आधी उन्हाचा, आता वादळी पावसाचा फटका

हिवराआश्रम : केळी उत्पादकांना या उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसला. उन्हाचे प्रमाण जास्त व पाणी कमी पडल्याने केळीचे उत्पादन घटले; त्यात केळीला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे यावर्षी केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले, तर आता पावसाळ्यात अनेक ठिकाणी वादळ- पावसामुळे फडाने भरलेली केळीची झाडेच भुईसपाट होत असल्याचे दिसून येत आहे.पश्चिम वऱ्हाडातील शेतकरी आधुनिक शेतीची कास धरत फळबाग घेण्याकडे वळले आहेत. त्यात केळी या फळबागेकडे सर्वाधिक शेतकऱ्यांचा कल आहे. बुलडाणा, वाशिम व अकोला या तीनही जिल्ह्यामध्ये सिंचनाची सुविधा असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केलेली आहे; परंतु आता केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.उन्हाळ्यात यावर्षी जास्त उन तापल्याने केळीच्या फडांना याचा सर्वाधिक फटका बसला. केळीला उन्हाळ्यात जास्त पाणी लागते; परंतु यावर्षी पाणी कमी पडल्याने उत्पादनातही घट आली. आता पावसाळ्यातही केळी फळबागेचे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळीची झाडे भुईसपाट झाली आहेत. केळीला लागलेल्या घडाचेही यामुळे नुकसान झाले आहे. परिणामी, यावर्षी केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मोडलेल्या झाडांना लाकडाचा आधारसोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने अनेक ठिकाणी केळीची झाडे पडलेली आहेत. त्यामुळे या पडलेल्या केळीच्या झाडांना लाकडाचा आधार देऊन उभे करण्याचे काम सध्या केळी उत्पादक शेतकरी करत आहेत. यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लाकडाच्या आधारावर केळीची झाडे सोसाट्याच्या वाऱ्यासमोर किती वेळ तग धरतात, याची शाश्वती नसल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. शासनाने सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.