शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

भरती प्रक्रियेत शासन मालामाल, बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल

By संदीप वानखेडे | Updated: June 10, 2023 18:11 IST

भरती प्रक्रियेत शासन मालामाल होत असून, बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल होत आहेत.

बुलढाणा : राज्य शासनाकडून वनविभागासह विविध विभागांच्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. एक हजारावर हे शुल्क पोहोचले आहेत. भरती प्रक्रियेत शासन मालामाल होत असून, बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल होत आहेत.

राज्यात मोठ्या अवधीनंतर राज्य सरकारकडून विविध विभागांतील रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येत आहेत. यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत़ लेखी परीक्षा घेण्याचे कंत्राट राज्य शासनाने कंपन्यांना दिले आहेत. या कंपन्यांकडून परीक्षा शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. 

आतापर्यंत आलेल्या जाहिरातींसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आधीच रोजगार नसलेल्या बेरोजगारांकडून शुल्कापोटी कोट्यवधी रुपये वसूल करून मालामाल होत आहे. दुसरीकडे बेरोजगार मात्र आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. शासनाने परीक्षा क्षुल्क कमी करण्याची मागणी राज्यभरातील सुशिक्षित बेरोजगारांकडून करण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या जागांसाठी ९०० रुपयेराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ५१२ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये लघुलेखक, लघुटंकलेखक पदासाठी खुल्या गटातील उमेदवारांसाठी ९०० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ८१० रुपये परीक्षा शुल्क वसूल करण्यात येत आहे. जवान, वाहनचालक आणि चपरासी पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी ८०० तर राखीव प्रवर्गासाठी ७२० रुपये शुल्क आहे.

पशुसंवर्धन, वनविभागासाठी एक हजार रुपयेपशुसंवर्धन विभागाच्या ४४६ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली हाेती. या जागांसाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आहे. वनविभागाच्या विविध पदांसाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये परीक्षा क्षुल्क आहे.

अनाथ उमेदवारांना ९०० रुपयेवनविभागाकडून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार, मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांसाठी ९०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा केवळ १०० रुपये फी कमी आहे.

अनेकजण राहणार वंचितरोजगार नसल्याने बेरोजगार आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच आता शासनाकडून ९०० ते एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने ते अर्जच करू शकणार नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा