शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भरती प्रक्रियेत शासन मालामाल, बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल

By संदीप वानखेडे | Updated: June 10, 2023 18:11 IST

भरती प्रक्रियेत शासन मालामाल होत असून, बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल होत आहेत.

बुलढाणा : राज्य शासनाकडून वनविभागासह विविध विभागांच्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. एक हजारावर हे शुल्क पोहोचले आहेत. भरती प्रक्रियेत शासन मालामाल होत असून, बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल होत आहेत.

राज्यात मोठ्या अवधीनंतर राज्य सरकारकडून विविध विभागांतील रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येत आहेत. यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत़ लेखी परीक्षा घेण्याचे कंत्राट राज्य शासनाने कंपन्यांना दिले आहेत. या कंपन्यांकडून परीक्षा शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. 

आतापर्यंत आलेल्या जाहिरातींसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आधीच रोजगार नसलेल्या बेरोजगारांकडून शुल्कापोटी कोट्यवधी रुपये वसूल करून मालामाल होत आहे. दुसरीकडे बेरोजगार मात्र आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. शासनाने परीक्षा क्षुल्क कमी करण्याची मागणी राज्यभरातील सुशिक्षित बेरोजगारांकडून करण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या जागांसाठी ९०० रुपयेराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ५१२ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये लघुलेखक, लघुटंकलेखक पदासाठी खुल्या गटातील उमेदवारांसाठी ९०० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ८१० रुपये परीक्षा शुल्क वसूल करण्यात येत आहे. जवान, वाहनचालक आणि चपरासी पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी ८०० तर राखीव प्रवर्गासाठी ७२० रुपये शुल्क आहे.

पशुसंवर्धन, वनविभागासाठी एक हजार रुपयेपशुसंवर्धन विभागाच्या ४४६ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली हाेती. या जागांसाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आहे. वनविभागाच्या विविध पदांसाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये परीक्षा क्षुल्क आहे.

अनाथ उमेदवारांना ९०० रुपयेवनविभागाकडून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार, मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांसाठी ९०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा केवळ १०० रुपये फी कमी आहे.

अनेकजण राहणार वंचितरोजगार नसल्याने बेरोजगार आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच आता शासनाकडून ९०० ते एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने ते अर्जच करू शकणार नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा