शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काका काकूच्या हत्येचा प्रयत्न करणारा पुतण्या दोषी; कोर्टानं निकाल राखून ठेवला

By अनिल गवई | Updated: February 14, 2023 19:56 IST

खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षेचा निकाल राखून ठेवला

खामगाव: पूर्ववैमनस्यातून तालुक्यातील लाखनवाडा येथील काका-काकूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ््या पुतण्यास खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरविले. शिक्षेचा निर्णय राखून ठेवत न्यायालयाने मंगळवारी कामकाज तहकूब केले.

हिवरखेड पोलीस स्टेशनतंर्गत लाखनवाडा येथे पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली होती. त्यावरून पोलिसात गुन्हे दाखल झाले होते. घटनेच्या दिवशी प्रल्हाद शिवराम पाचपोर आणि त्यांचा भाऊ समाधान शिवराम पाचपोर यांच्यात २१ जून रोजी भांडण सुरू होते. दरम्यान, साडेसात वाजताच्या दरम्यान, अरविंद प्रल्हाद पाचपोर तेथे ट्रॅक्टर घेऊन आला. त्यावेळी त्याचे वडील प्रल्हाद पाचपोर यांनी अरविंदला चिथावणी देत, भावाच्या अंगावर ट्रॅक्टर चालविण्यास सांगितले.

वडिलांच्या सांगण्यावरून अरविंद ट्रॅक्टर वेगात घेत असतानाच, त्याची काकू प्रमिला पतीला वाचविण्यासाठी समोर आली. अरविंदने जीवे मारण्याच्या उद्देशाने दोघांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेले. यात पायावरून ट्रॅक्टर गेल्याने दोन्ही पती पत्नी गंभीर जखमी झाले. अशी तक्रार घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार अनंता वसंता पांढरे यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली. तत्पूवीर् जखमींना लाखनवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर अकोला येथील सर्वेापचार रूग्णालया दाखल केले. तेथे जखमींचे बयाण नोंदविल्यानंतर आरोपी प्रल्हाद शिवराम पाचपोर व अरविंद प्रल्हाद पाचपोर दोघेही रा. लाखनवाडा यांच्या विरोधात भादंवि कलम ३०७, ३२६, ५०६, ३४ अन्वये दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयाने ११ साक्षीदार तपासले. जखमी पती पत्नी, बयाण नोंदविणारे डॉक्टर व तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. डॉ.कल्याणी पांढरे, आणि तपास अधिकारी सपोनि व्ही. आर. पाटील यांची साक्ष जखमींच्या साक्षीला पूरक असल्याने िजल्हा सत्र न्यायाधीश ए.एस.वैरागडे यांनी एका आरोपीस दोषी ठरविले. खटला सुरू असतानाच दुसरा आरोपी प्रल्हादचा मृत्यू झाला. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी काम पाहीले. कोर्ट पैरवी नापोकॉ संतोष धनोकार यांनी केली.

जखमींच्या मुलासही पेटवले

सन २०१३ मध्ये आरोपी अरविंद शिवराम पाचपोर आणि त्याचे वडील प्रल्हाद शिवराम पाचपोर यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळी पितापुत्रांचे भांडण आवरण्यास जखमी पती-पत्नीचा मुलगा शिवाजी गेला होता. त्यावेळी त्याच्यावर दोघा बापलेकांनी पेट्रोल टाकून पेटविले होते. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे समजते.