शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

चुका सुधारून पुढची पिढी घडविण्यासाठी कार्य करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:33 IST

चिखली : अस्वच्छता आणि घाणीमुळे रोगराई पसरते व त्यामुळे आपल्या देशात आजारी पडणारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. वर्षानुवर्षांपासून आपण करीत असलेल्या चुकांमुळे आपणच देशाचे एकप्रकारे आर्थिक नुकसान करीत आलो आहोत.

ठळक मुद्देस्वच्छता दूत भास्करराव पेरे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : अस्वच्छता आणि घाणीमुळे रोगराई पसरते व त्यामुळे आपल्या देशात आजारी पडणारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. वर्षानुवर्षांपासून आपण करीत असलेल्या चुकांमुळे आपणच देशाचे एकप्रकारे आर्थिक नुकसान करीत आलो आहोत. केवळ देशभक्तीपर गीते गाऊन देशभक्ती सिद्ध होत नाही, तर देशाला सुदृढ आणि निरोगी बनविणार्‍या स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबवून देशाला प्रगतिपथाकडे नेण्यासाठी कार्य करा, उघड्यावर शौचास बसणे, अस्वच्छ पाणी पिणे अशा चुका आपण करीत आलो; परंतु आता त्या टाळून भावी पिढी घडविण्यासाठी कार्य करा, असे आवाहन स्वच्छतादूत आदर्श ग्राम पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे यांनी केले.तालुक्यातील मंगरूळ (इ.) येथे स्वच्छता अभियानांतर्गत शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता आयोजित विशेष सभेत सरपंच पेरे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी आदर्श ग्राम पाटोदा येथे राबविलेल्या विविध योजना व अभियानाविषयी ग्रामस्थांना सखोल माहिती दिली. तसेच सन २00५ मध्ये त्यांच्या गावात स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधण्यास सुरुवात केली, तेव्हा गावातील सुमारे चारशे महिलांनी बँकेचे कर्ज काढून शौचालये बांधले. आता तुम्हाला शासन बारा हजार रुपये देत असतानाही तुम्ही शौचालय का बांधत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यासह आई-वडिलांची सेवा, पती-पत्नी यांनी एकमेकांना समजून घेणे, मुलांना चांगले शिक्षण देणे, सात्त्विक आहार, शरीरातील घाणीची योग्य विल्हेवाट लावणे ही पंचसूत्री अमलात आणून गावात स्वच्छतेची मोहीम यशस्वी करण्याबाबत सांगितले. प्रसंगी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, सरपंच देवानंद गवते यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प.स. सभापती संगीता पांढरे, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सुनंदा शिनगारे, कणखर, प.स. सदस्य उषा थुट्टे, द्वारका भोसले, उद्धव पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रामेश्‍वर रिंढे, सचिव आनंद पाटील, ग्रा.प. सदस्य कावेरी शिंदे, शारदा सुरूशे, मिलिंद बोर्डे, अंबादास गवते, शिवाजी शिंदे, प्रकाश शिंदे, गणेश सुरूशे, दिनकर लोखंडे, ग्रामसेवक शेळके, सिंधू बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेला ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.